हरयाणामधील लाहली हे छोटेसे गाव पहिलवानांसाठी ओळखले जाणारे, पण आखाडय़ांच्या या गावात आता क्रिकेटमय वातावरण पसरले आहे. याचे कारणही तसेच आहे. सचिन तेंडुलकर नावाचा क्रिकेटच्या दुनियेतील बेताज बादशाह आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील अखेरचा रणजी सामना येथे खेळणार आहे. रविवारपासून हरयाणाविरुद्धच्या सामन्याने गतविजेत्या मुंबईच्या रणजी मोसमाला प्रारंभ होईल.
पुढील महिन्यात सचिन आपल्या कारकिर्दीतील अखेरची कसोटी मालिका खेळणार आहे. या पाश्र्वभूमीवर सचिनसाठी हा अखेरचा सराव सामना असेल. मुंबईतील दुसऱ्या कसोटीनंतर सचिन आपल्या २४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला अलविदा करणार आहे.
रोहटकपासून १५ किमी अंतरावरील चौधरी बन्सी लाल स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याची आसपासच्या गावागावांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. सचिनला याचि डोळा पाहण्यासाठी मोठी उत्कंठा येथे निर्माण झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा