महाराष्ट्राच्या खो-खो संघाचे प्रशिक्षक महेश पालांडे यांची भावना

मुंबई : दोन वर्षांपूर्वी झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या महिला संघात सांघिक कामगिरीचा अभाव आढळला. यंदा मात्र सर्वानी एकत्रित मिळून खेळ उंचावल्याने महाराष्ट्राने जेतेपद मिळवले, असे मत महाराष्ट्राच्या महिला संघाचे प्रशिक्षक महेश पालांडे यांनी व्यक्त केले.

Pak pm Shehbaz Sharif on champions trophy
जेतेपद मिळविण्याइतकेच भारताला हरविणे महत्त्वाचे!पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांचे वक्तव्य
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
controversy fight between players during a cricket match kopri thane viral video
ठाणे : एका चेंडूत दोन धावा, अन् आयोजक सिद्धू अभंंगेसोबत संघाचा राडा, चाकू भिरकावल्याचा दोन्ही गटांकडून दावा, व्हिडीओ वायरल
Ranji Trophy Himanshu Sangwan Revealed Bus Driver Gives Surprise Advice To Dismiss Virat Kohli
Ranji Trophy: “विराटला बाद करायचंय तर चेंडू…”, बस ड्रायव्हरने दिला किंग कोहलीला बाद करण्याचा सल्ला, हिमांशू सांगवानचा मोठा खुलासा
Kevin Pietersen praises Harshit Rana bowling as a connection substitute during IND vs ENG 4th T20I at Pune
Harshit Rana : “त्याची चूक नाही…”, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे कनक्शन सब्स्टिट्यूट वादात हर्षित राणाच्या समर्थनार्थ वक्तव्य
India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Yannick Sinner made a statement about achieving success on other surfaces after winning the American and Australian championships
अन्य पृष्ठभागांवरही यश आवश्यक -सिन्नेर

जबलपूर (मध्य प्रदेश) येथे डिसेंबरमध्ये झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाला नमवून २३व्यांदा अजिंक्यपद पटकावले. तसेच २०१९मध्ये छत्तीसगडला झालेल्या पराभवाचा वचपा काढला. ‘‘महाराष्ट्राच्या कामगिरीचा तुम्ही आढावा घेतल्यास कोणत्याही एका खेळाडूच्या बळावर आम्ही हे जेतेपद मिळवलेले नाही, हे दिसून येते. प्राधिकरणातील खेळाडू उत्तम आहेत, यात शंका नाही. परंतु यावेळी आमची सांघिक कामगिरी अधिक उजवी ठरली,’’ असे पालांडे म्हणाले.

‘‘गतवेळेस नवे खेळाडू संघातील अनुभवी खेळाडूंशी मोकळेपणाने संवाद साधताना संकोच बाळगत होते, असे वाटले. परंतु यंदा तसे काहीही दिसले नाही. राज्य अजिंक्यपद स्पर्धेत या सर्व खेळाडूंचा खेळ मी जवळून पाहिला आणि त्यावेळीच यंदा आपण प्राधिकरणाला नमवणार, याची खात्री पटली. त्यांच्याविरुद्ध डाव्या आक्रमणाची चाल यशस्वी ठरली,’’ असेही पालांडे यांनी नमूद केले. दरम्यान, खो-खोमध्ये दर तीन वर्षांनी प्रशिक्षक बदलण्याची प्रथा आहे. पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राने दोनदा जेतेपद मिळवले. त्यामुळे पुन्हा प्रशिक्षकपदासाठी विचारणा केली, तर तुम्ही तयार असाल का, या प्रश्नावर अद्याप विचार केलेला नाही, असे पालांडे यांनी उत्तर दिले. याशिवाय रेल्वेचा महिलांचा संघ सुरू झाला तर महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी व्यावसायिकदृष्टय़ा नक्कीच उत्तम होईल. परंतु महाराष्ट्राला रेल्वे आणि प्राधिकरणाच्या तोडीचा संघ तयार करण्यासाठी आतापेक्षा अधिक परिश्रम घ्यावे लागतील, याकडेही पालांडे यांनी लक्ष वेधले.

Story img Loader