सध्या भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याच्या फॉर्मवरून त्याला संघात जागा मिळावी की नाही, याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. अनेक माजी खेळाडूंनी धोनीचं वाढत वय पाहता त्याला टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला. २०१९ चा विश्वचषक लक्षात घेऊन धोनीने केवळ वन-डे सामन्यांवर आपलं लक्ष केंद्रीत करावं असं मत अनेक माजी खेळाडूंनी व्यक्त केलं होतं. मात्र, सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री हे धोनीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आपल्या कर्णधारपदाच्या काळात धोनीने भारताला जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळवून दिलं होतं. सौरव गांगुलीनंतर महेंद्रसिंह धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. ‘द प्रिंट’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत धोनीने आपल्या कर्णधारपदाची संधी कशी मिळाली, याचा खुलासा केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा