भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) भारत आणि इंग्लंडदरम्यान मँचेस्टर येथे होणारा पाचवा कसोटी सामना रद्द केला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिलीय. भारतीय संघातील भारतीय क्रिकेट संघाचे साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची करोना चाचणी सकारात्मक आल्यामुळे खेळाडूंनाही करोना संसर्गाचा धोका असल्याने कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा करताना इंग्लंड क्रिकेट बोर्डाने खोडकळपणाने भारताने माघार घेतल्याचा दावा केला होता. अधिकृत माहिती देताना भारताने सामना forfeit केला म्हणजेच माघार घेतली असं आधी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने म्हटलं होतं. मात्र काही वेळातच त्यात बदल करण्यात आला आणि माघार घेतली हा शब्द करुन टाकण्यात आला. असं असलं तरी या पत्रकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून भारतीय क्रिकेट चाहत्यांनी त्यावरुन नाराजी व्यक्त केलीय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा