भारतीय क्रिकेट गेल्या काही दिवसांपासून कर्णधारपदाच्या वादामुळे चर्चेच असताना संघ दक्षिण अफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून यावेळी या वादाचा संघावर काही परिणाम होतो का हे पहावं लागणार आहे. दरम्यान कसोटी संघाचं नेतृत्व मिळालेला रोहित शर्मा दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहे. तर दुसरीकडे विराट कोहली तीन सामन्यांच्या मालिकेसाठी संघासोबत दाखल झाला आहे. यादरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रोहित शर्माच्या नेतृत्वाबद्दल मोठं विधान केलं आहे.

..तर भारतीय संघ त्वरित मायदेशी!; ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट दक्षिण आफ्रिका संघटनेची ‘बीसीसीआय’ला हमी

acknowledged personalities in hingoli honored with gratitude
हिंगोलीत अमृततुल्य व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा गौरव सोहळ्यात जागर
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Rohit Sharma Surpasses Sachin Tendulkar To Become Indias Second Leading Run Scorer As Opener
IND vs ENG: रोहित शर्माची ऐतिहासिक कामगिरी, सचिन तेंडुलकरचा मोडला विक्रम; मास्टर ब्लास्टरला मागे टाकत हिटमॅनने…
राहुल गांधींनी उल्लेख केल्याने बावनकुळेंचा कामठी मतदारसंघ पुन्हा चर्चेत
Maharashtra News Live Updates in Marathi
Maharashtra News Updates : देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ भूमिकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “उद्योजकांबाबत घेतलेली भूमिका…”
नामदेव महाराज शास्त्री हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील भगवानगडाचे महंत आहेत. (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Namdev Shastri Kirtan : कोण आहेत भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री? त्यांच्या कीर्तनास विरोध का होत आहे?
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?

Explained: विराट, रोहित, बीसीसीआय नी कर्णधारपद; काय आहे नेमका वाद?

सचिन तेंडुलकरने बोरिया मजुमदार यांना त्याचा युट्यूब कार्यक्रम ‘Backstage with Boria’ मध्ये दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्माच्या नेतृत्वावर भाष्य केलं. “रोहित स्वत: एक अनुभवी खेळाडू आहे. त्याच्याकडे कौशल्य असून त्याच्याकडे असणारा यशाचा अनुभव पुढेही कायम राहावा. त्याने मुंबई इंडियन्ससोबत करुन दाखवलं आहे आणि आता भारतासाठी करुन दाखवण्याची वेळ आली आहे,” असं सचिनने यावेळी सांगितलं.

अश्विनचं कौतुक

सचिन तेंडुलकरने यावेळी फिरकी गोलंदाज आर अश्विनचंही कौतुक केलं. “अश्विनचा अनुभव आणि ज्याप्रकारे तो गोलंदाजीत बदल करण्याच्या त्याच्या क्षमतेने मला खूपच प्रभावित केलं आहे. टी-२० तही त्याने चांगली कामगिरी केली असून आपल्या गोलंदाजीत अनेक बदल दाखवले आहेत,” असं सचिनने म्हटलं.

सचिनने यावेळी दक्षिण आफ्रिकेविरोधातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी असणारी गोलंदाजी संतुलित असल्याचं सांगितलं आहे. संघात वेगवेगळ्या गतीचे गोलंदाज असून त्याच्यात २० विकेट घेण्याची क्षमता असल्याचं सचिनने सांगितलं आहे.

“गोलंदाजांमध्ये २० विकेट घेण्याची क्षमता”

“गोलंदाजीत आपलं आक्रमण संतुलित असेल. आपल्याकडे वेगवेगळे जलद गोलंदाज आहेत. बुमराह, सिराज, शार्दूल, उमेश या सर्वांची शैली वेगळी आहे. त्यात इशांतचा अनुभवही फायद्याचा ठरेल. आणि हे सर्व त्या दिवशी काय स्थिती आहे त्यावर अवलंबून असेल. कारण आपले अनेक खेळाडू जखमी झाले असून यात फिरकी गोलंदाज आहेत. जर गोलंदाज चांगला खेळत असले तर त्याने जास्तीत जास्त खेळलं पाहिजे. आणि मी जे पाहिलं आहे त्यातून आपल्या गोलंदाजांमध्ये २० विकेट घेण्याची क्षमता आहे,” असं सचिनने म्हटलं.

कोहलीच्या कर्णधारपदाबाबत गांगुलीचे भाष्य अनावश्यक! भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे मत

२६ डिसेंबरपासून मालिकेला सुरुवात

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आधी १७ डिसेंबरपासून खेळवला जाणार होता. मात्र, आफ्रिकेतील ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा दौरा नऊ दिवस लांबणीवर पडला. भारतीय खेळाडूंनी आता सरावाला सुरुवात केली असली तरी त्यांना विविध र्निबधांचे पालन करावे लागत आहे.

Story img Loader