पीटीआय, चेन्नई

भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यांनाही मुकण्याची शक्यता आहे. वैयक्तिक कारणास्तव तो पहिल्या दोन सामन्यांतही खेळू शकला नव्हता. कोहलीसारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूची भारतीय संघाला उणीव भासणार यात शंकाच नाही. मात्र, त्याच्या अनुपलब्धतेमुळे भारतीय संघाचेच नाही, तर या मालिकेचे आणि जागतिक क्रिकेटचे खूप नुकसात होत आहे, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने व्यक्त केले.

IND vs BAN Rohit Sharma on KL Rahul and Sarfaraz Khan ahead 1st Test match
IND vs BAN : केएल राहुल की सर्फराझ खान? रोहित शर्माने केले स्पष्ट; ‘या’ खेळाडूला मिळणार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?
Virat Kohli Breaks Wall of Chepauk Dressing Room During Practice Session In Chennai
Virat Kohli: कोहलीचा विषय लय हार्डय! विराट कोहलीच्या एका शॉटने भिंतीला पाडलं भगदाड, VIDEO व्हायरल
Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
Bangladesh historic victory over Pakistan, cricket,
विश्लेषण : बांगलादेशने कसा साकारला पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय? भारताला धक्का देण्याची शक्यता किती?
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
PAK vs BAN Mohammed Rizwan Broke Rishabh Pant and Andy Flower Record
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानने मोडला ऋषभ पंतचा विक्रम, पराभूत कसोटी सामन्यात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला पाकिस्तानी यष्टिरक्षक

कोहलीच्या अनुपस्थितीत खेळताना भारताला हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, भारताने दमदार पुनरागमन करताना दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत पाच सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. या मालिकेतील तिसरा सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोट येथे खेळवला जाणार आहे.

हेही वाचा >>>U19 World Cup Semi Final: ठरलं! रविवारी भारत ऑस्ट्रलिया वर्ल्डकप फायनल; पाकिस्तानवर थरारक विजय

‘‘कोहली पुढील दोन कसोटी सामन्यांतही खेळणार नाही अशी चर्चा आहे. मात्र, भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतरच नक्की काय ते कळू शकेल. तो आणखी किती सामन्यांना मुकणार हे निश्चित नाही. परंतु कोहलीसारख्या खेळाडूची अनुपलब्धता हा भारतासाठी खूप मोठा धक्का आहे. कोहली खेळत नसल्याने केवळ भारतीय संघाचे नाही, तर या मालिकेचे आणि जागतिक क्रिकेटचेही मोठे नुकसान होत आहे. मात्र, त्यामुळे या मालिकेचे महत्त्व कमी झालेले नाही. या मालिकेतील पहिले दोनही सामने चुरशीचे झाले आणि उर्वरित सामन्यांतही दोन्ही संघ दर्जेदार खेळ करतील यात शंका नाही,’’ असे हुसेन म्हणाला.