Natasa Stankovic Video with Alexander Alex: भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टॅनकोविक विभक्त झाले आहेत. यानंतर हार्दिक पंड्या पूर्णवेळ क्रिकेटसाठी आपला वेळ देताना दिसत आहे. काही काळापूर्वी तो लंडनमध्ये होता जिथे तो क्रिकेटचा सराव करताना दिसला होता. तर नताशा इन्स्टाग्रामवर पोस्ट स्टोरी शेअर करत असते. घटस्फोटानंतर नताशा मुलगा अगस्त्यसह सर्बियाला गेली होती. सर्बियाहून परतल्यानंतर नताशा मॉडेल अलेक्झांडर ॲलेक्सबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. दोघांचे फोटो, व्हीडिओ ती शेअर करत असते.

नताशा तिचा मुलगा अगस्त्यला घेऊन सर्बियाला गेली होती. तिथून परतल्यानंतर अनेकदा नताशा आणि अलेक्झांडर अनेकदा एकत्र दिसले आहेत. दोघेही कधी जिममध्ये तर कधी स्विमिंग पूलमध्ये एकत्र दिसत आहेत. अलेक्झांडर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये नताशा पूलमध्ये फ्लोटरवर आराम करताना दिसली. अलेक्झांडर मागून आला आणि त्याने नताशाला पाण्यात टाकलं. अचानक पाण्यात पडल्याने नताशा हादरली. अलेक्झांडरच्या या व्हिडिओवर कमेंट करताना नताशाने हसणारे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा – IND vs BAN: रोहित शर्माचे पहिल्याच २ चेंडूंवर २ दणदणीत षटकार, १४७ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असं काही

नताशाने देखील आज याच स्विमिंग पूलमधील फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या व्हीडिओमध्ये नताशा स्विमिंगपूलमध्ये आराम करत आजूबाजूच्या वातावरणाचा आनंद घेताना दिसली. या व्हिडिओने नेटिझन्समध्ये त्यांच्या नात्याबद्दल उत्सुकता निर्माण केली आहे. यापूर्वी अशी अफवा पसरली होती की अलेक्झांडर दिशा पटानीला डेट करत आहे. मात्र या व्हिडिओने चाहत्यांचा गोंधळ उडाला आहे. काही चाहते म्हणत आहेत की हे दोघे फक्त मित्र आहेत तर काही जणांनी या दोघांच्या नात्याबद्दल शंका व्यक्त केली आहे.

हेही वाचा – IND vs BAN: ऋषभमुळे विराट रनआऊट होता होता वाचला; कोहलीचा रुद्रावतार पाहून पंत जवळ गेला अन्… VIDEO व्हायरल

घटस्फोटानंतर हार्दिक पंड्या बराच काळ भारतापासून बाहेर होता. यादरम्यान तो त्याचा लेक अगस्त्यलाही भेटला नव्हता. घटस्फोटानंतर हार्दिक अगस्त्यला हल्लीच पहिल्यांदा भेटला. ज्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत होते. एअरपोर्टवरील हार्दिक आणि अगस्त्यचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. हार्दिक पंड्याची बांगलादेशविरूद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे. कसोटी मालिकेनंतर आता येत्या ६ ऑक्टोबरपासून भारत वि बांगलादेश यांच्यात टी-२० मालिका खेळवली जाणार आहे.