India Tour of South Africa: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील पराभवातून सावरत भारताने आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीकडे लक्ष वेधले आहे. आगामी काळात भारतीय संघाला सलग टी-२० मालिकांना सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, टी-२० फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा कणा मजबूत करणाऱ्या रोहित आणि कोहली ही जोडी २०२२च्या विश्वचषकानंतर कुठल्याही टी-२० सामन्यात खेळलेली नाही. सध्या ते करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत. त्यामुळे त्यांनी लांबचा विचार करत असल्याचे काही क्रिकेट तज्ञांचे म्हणणे आहे. यावर माजी खेळाडू आकाश चोप्राने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

गेल्या वर्षी फक्त टी-२० वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-२० मॅचमध्ये एकत्र दिसले होते. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने या दोन्ही खेळाडूंच्या टी-२० सामने न खेळण्याच्या मागे कारणावर मत व्यक्त केले आहे. आकाश चोप्राने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट केले की, “मला वाटत नाही की रोहितने कधीही कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जर तो असं म्हटला असेल तुम्ही मला दुरुस्त करा. जर माझे काही चुकले असेल तर मला सांगा पण त्याने कधीच नाही म्हटले की मी टी-२० क्रिकेट खेळणार नाही. त्याबद्दल त्याला तो खेळणार आहे की याचे उत्तर देण्याची गरज नाही, असे मला वाटते.”

Leader of Opposition in Lok Sabha and Congress MP Rahul Gandhi and party General Secretary Priyanka Gandhi Vadra
Ujjain Rape News: उज्जैनमधील उघड्यावर बलात्कार प्रकरण मानवतेला कलंक; राहुल गांधी, प्रियांका गांधींनी व्यक्त केला संताप
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Pakistan Former Cricketer Javed Miandad Inzamam Ul aq Slams PCB and Cricket Team for Poor Performance PAK vs BAN
PAK vs BAN: “हा एक वाईट संकेत आहे…” फक्त खेळाडू नाही तर PCB वरही भडकले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू; जावेद मियांदाद, इंजमाम यांच्या वक्तव्याने वेधले लक्ष
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
Sanjay Manjrekar brually trolled by fans
Duleep Trophy 2024 : रोहित-विराट, बुमराहच्या विश्रांतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या माजी खेळाडूला चाहत्यांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…
Wasim Jaffer on Shikhar Dhawan Retirement
Shikhar Dhawan : ‘जितक्या कौतुकासाठी पात्र होता तेवढे कौतुक कधीच…’, धवनबद्दल माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य; म्हणाला, तो संघहिताला…
Rohit Sharma react on bat selection process
Rohit Sharma : “मी ‘हे’ करत नाही पण संघातील खेळाडू…”, रोहित शर्माने सांगितलं ड्रेसिंग रुममधलं गुपित, बॅट निवडीवर म्हणाला…
News About Sanjoy Roy What His Mother in Law Said?
Sanjoy Roy : “संजय रॉयला फाशी दिली तरीही आम्हाला काहीच..”, कोलकाता प्रकरणातील आरोपीच्या सासूची प्रतिक्रिया

माजी सलामीवीर फलंदाजाने पुढे लिहिले की, “खरं तर, गेल्या टी-२० विश्वचषकापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतासाठी खेळलेल्या कोणत्याही टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेचा भाग का नव्हते? याचा कोणीही उल्लेख केलेला नाही. हे एक गूढ आहे आणि कोणीही ते सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. ते आगामी टी-२० विश्वचषक खेळणार नाहीत, असे कोणीही सांगितलेले नाही.”

ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडला होता. या सामन्यातच कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-२० सामना खेळताना दिसले होते. इंग्लंडविरुद्धच्या पराभवाला एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. तेव्हापासून या दोन्ही खेळाडूंनी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटपासून अंतर लांब आहेत.

हेही वाचा: T20 World Cup 2024: युगांडा क्रिकेट संघाने इतिहास रचला, २०२४च्या टी-२० विश्वचषकासाठी पहिल्यांदाच ठरला पात्र

दोन्ही खेळाडूंना सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी, ताज्या माहितीनुसार, विराट कोहलीने आगामी दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेतील टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. याबाबत त्याने बीसीसीआयला विनंती केल्याचेही समोर आले आहे.