ODI World Cup 2023: २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. संपूर्ण विश्वचषकाचे यजमानपद भारताला देण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयसीसी ट्रॉफीचा १० वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी संघाचा डोळा या ट्रॉफीवर असणार आहे. भारताने शेवटची आयसीसी ट्रॉफी २०१३ मध्ये जिंकली होती. रोहित शर्मा, विराट कोहली आदी स्टार्सनी सजलेला हा संघ विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. मात्र, मोहम्मद कैफच्या मते ना रोहित शर्मा ना विराट कोहली भारताला जसप्रीत बुमराहच टीम इंडियाला विश्वचषक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह एका वर्षापासून टीम इंडियातून बाहेर होता. दुखापतग्रस्त बुमराह गतवर्षीही विश्वचषक आणि आशिया चषक खेळला नव्हता, त्यामुळे संघाला त्याची उणीव भासली होती. मात्र, आता तो पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. बुमराह आयर्लंड मालिकेद्वारे पुनरागमन करत आहे, या दौऱ्यावर त्याला भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. तो पूर्णपणे तंदुरुस्त राहिल्यास त्याचा विश्वचषक संघात निश्चितपणे समावेश केला जाईल.

Sai Sudharsan slams double century for Tamil Nadu against Delhi in Ranji Trophy 2024 Elite Group
Sai Sudharsan : साई सुदर्शनने टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी ठोकला दावा, दिल्लीविरुद्ध झळकावले वादळी द्विशतक
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
IND vs BAN 3rd T20I Sanju Samson credited captain Suryakumar Yadav and coach Gautam Gambhir
IND vs BAN : ‘मी खूप वेळा अपयशी ठरलो आहे पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनच्या प्रतिक्रियेने टीम इंडियासह चाहत्यांची जिंकली मनं
Border Gavaskar Trophy Sanjay Manjrekar statement on Virat Rohit
विराट-रोहितचा काळ गेला, आता ‘हा’ खेळाडू भारताचा सर्वोत्तम खेळाडू; Border Gavaskar Trophy पूर्वी संजय मांजरेकरांचं वक्तव्य
Rohit Sharma Likely To Miss IND vs AUS One Test in Australia Border Gavaskar Trophy
Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काही कसोटींना मुकणार? काय आहे कारण
T20 World Cup INDW beat WIW by 20 Runs in Womens World Cup Warm Up Match
Women’s T20 World Cup: T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची जोरदार तयारी, पहिल्या सराव सामन्यात वर्ल्ड चॅम्पियनचा केला पराभव; जेमिमा-पूजाची चमकदार कामगिरी
Sanjay Manjrekar on Mohammed Shami for Border Gavaskar Trophy
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी मोहम्मद शमी फिट नसेल तर ‘हा’ गोलंदाज उत्तम पर्याय; संजय मांजरेकरांचं वक्तव्य
IND vs BAN Sanjay Manjrekar Statement on Rohit Sharma For Not Giving Bowling to Ravindra Jadeja
IND vs BAN: “रोहितला हे आकडे दाखवण्याची गरज…”, रोहित शर्मावर भडकला माजी भारतीय क्रिकेटपटू, जडेजाला गोलंदाजी न दिल्याबद्दल सुनावलं

हेही वाचा: IND vs WI: तिसऱ्या सामन्याआधी वेस्ट इंडीजला मोठा धक्का! निकोलस पूरनला अंपायरशी वाद घालणं पडलं महागात, आयसीसीने केली कारवाई

टाईम्स ऑफ इंडियाशी झालेल्या संभाषणात माजी भारतीय खेळाडू मोहम्मद कैफ म्हणाला, “वेस्ट इंडिजविरुद्ध सलग २ सामने गमावूनही चाहत्यांनी काळजी करण्याची गरज नाही. या मालिकेच्या निकालावर संघाचे मोजमाप करणे योग्य नाही. बुमराहची अनुपस्थिती ही एक मोठी बाब आहे आणि त्याच्या पुनरागमनामुळे संघाचे मनोबल उंचावेल आणि टीम इंडियाला विश्वचषक जिंकण्यास मदत होईल.”

दिग्गज खेळाडू कैफ पुढे म्हणाला, “भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध २ सामने गमावले आहेत, आपण याबद्दल जास्त विचार करू नये. या दोन पराभवानंतर चाहते नकारात्मक प्रतिक्रिया येत असल्याचे मला दिसते. मला एवढेच सांगायचे आहे की आमचा संघ खूप स्पर्धात्मक आहे. या सलग दोन पराभवांवरून मी संघाला वाईट ठरवणार नाही. भारताचे बरेच खेळाडू या टी२० मालिकेत खेळत नाही आहेत, त्यामुळे भारतीय संघ कमकुवत झाला आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही.”

हेही वाचा: Babar Azam: “जल्दी करो दुआ का…”, लंका प्रीमिअर लीगमधील बाबर आझमचा मजेशीर Video व्हायरल

मोहम्मद कैफ पुढे म्हणाला, “बुमराहची अनुपस्थिती हे पराभवाचे मोठे कारण आहे. बुमराह बरा झाला आहे त्यामुळे त्याला अजूनही मॅच फिटनेसची गरज आहे. जर त्याने मॅच फिटनेस परत मिळवला तर टीम इंडियासाठी ही आनंदाची बातमी असेल. जर बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर भारत घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकेल अशी शक्यता आहे.