पाकिस्तान विरुद्धच्या पराभवाचा अजिबात धक्का बसला नसून उलट संघात अनुभवाची कमतरता असूनही संघाने दाखविलेल्या सांघिक कामगिरीने प्रभावित झाल्याचे कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे.
कोहली म्हणतो, पराभवाचा मला अजिबात धक्का बसलेला नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन जाऊ शकलो यावर मी प्रभावित झालो आहे. संघातील प्रत्येक जण उत्तम कामगिरी करत आहे. पाकिस्तान संघात अनुभवी फलंदाज असूनही भारतीय गोलंदाजांनी अनुभवाची कमतरता असूनही कडवे आव्हान दिले असल्याचेही कोहली म्हणाला. यावेळी त्याने अमित मिश्राच्या गोलंदाजीची प्रशंसाही केली.
आशिया चषकात गेल्या दोन सामन्यांत श्रीलंका आणि पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आशिया चषकात अपयशाची टांगती तलवार भारतीय संघावर आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा