व्हिव्हियन रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली यांसारख्या त्या काळातील महान खेळाडूंसोबत आपले नाव घेतले जाते तेव्हा आपल्या फलंदाजीचे कौतुक मनाला भावणारे ठरते. हे असे खेळाडू असतात ज्यांनी फक्त त्यांचे नाव चार्टच्या शीर्षस्थानीच पोहोचवले नाही तर विक्रमांची भरपूर मोठी यादी बनवत संपूर्ण खेळाची व्याख्या बदलून टाकली आहे. आणि त्याचप्रमाणे भारताचे दिग्गज माजी अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांना सूर्यकुमार यादव बबत बोलताना म्हटले. असा खेळाडू ‘शतकात एकदाच पाहायला मिळतो’ असे म्हणत भारताच्या फलंदाजाची प्रशंसा केली.

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट येथे झालेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या टी२० सामन्यात सूर्यकुमारने श्रीलंकेविरुद्ध ५१ चेंडूत ११२ धावांची धडाकेबाज खेळी केल्यानंतर कपिल देव यांनी त्याच्यावर विशेष टिप्पणी केली. भारताच्या क्रमांक ४ च्या फलंदाजाच्या शतकामुळे संघाला पाच गडी गमावत २२८ धावांपर्यंत मजल मारता आली आणि गोलंदाजांनी पाहुण्यांना केवळ १३७ धावांत गुंडाळल्यामुळे भारताचा विजय सुकर झाला.

हेही वाचा: Suryakumar Yadav: “जरा सा चूम लू मे…” मैदानात सुर्यासोबत चहलने केले असे कृत्य पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही, Video व्हायरल

एबीपी न्यूजशी बोलताना, १९८३ च्या विश्वचषक विजेत्या कर्णधाराने सूर्यकुमारच्या खेळीबद्दल गौरवोद्गार काढले आणि त्याच्या फलंदाजीच्या पराक्रमाची तुलना सचिन, रिचर्ड्स, कोहली, रिकी पाँटिंग सारख्या दिग्गजांशी केली. ते म्हणाले की, “कधीकधी त्याच्या खेळीचं वर्णन कसं करावं या विचाराने मला शब्द सुचत नाही. जेव्हा आपण सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली पाहतो, तेव्हा आपल्याला वाटतं की कधीतरी असा खेळाडू असेल जो आपल्याला या यादीचा भाग आहे असं वाटायला भाग पाडेल. भारतात खरोखरच खूप प्रतिभावान खेळाडू आहेत. त्याने लॅपने एक ओव्हर फाईन लेग शॉट मारला, त्यानंतर तो गोलंदाज घाबरून गेला कारण तो उभा राहून मिड-ऑन आणि मिड-विकेटवर देखील षटकार मारत होता. तो ज्या प्रकारचे क्रिकेट खेळतो ते बघण्यासारखे असते.”

सूर्यकुमारचे कौतुक करताना ते पुढे म्हणतात, “त्याच्यासमोर गोलंदाजांना अवघड जाते कारण तो रेषा आणि लांबी सातत्याने निवडू शकतो. मी डिव्हिलियर्स, व्हिव्हियन रिचर्ड्स, सचिन, विराट, रिकी पाँटिंग सारखे महान फलंदाज पाहिले आहेत, पण फार कमी जण चेंडूला मोकळेपणाने मारू शकतात. सूर्यकुमार यादवला सलाम. असे खेळाडू शतकात एकदाच येतात.”

हेही वाचा: Virat Kohli Instagram: “प्रसिद्धीची इच्छा हा आजार…एक दिवस…”, किंग कोहलीची श्रीलंका वनडे मालिकेपूर्वी फिलॉसॉफिकल पोस्ट व्हायरल

इतराशी तुलना करताना ते म्हणतात, “रोहित आणि कोहलीनंतर, देशातील क्रिकेट चाहत्यांच्या कल्पनेला भुरळ घालणारा सध्याचा भारताचा फलंदाज असेल तर तो सूर्य आहे. २०२१ मध्ये भारतात पदार्पण केल्यापासून, स्काय एक शानदार फलंदाजी आकर्षणाचे केंद्र बनला आहे. तेंडुलकरचे १९९८, तर कोहलीचे २०१६ चे प्रसिद्ध खेळाडू होते. सूर्यकुमारसाठी प्रसिद्धीचे वर्ष हे २०२२ होते जेव्हा या भारताच्या फलंदाजाने ११०० पेक्षा जास्त धावा करत जगातील टी२० मधील पहिल्या क्रमांकाचे रँकिंग मिळाले आणि तेव्हापासून तो या स्थानावर कायम आहे.”