BCCI on Champions Trophy 2025: पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चे आयोजन करणार आहे, त्यासाठी आयसीसीने यजमानपदाचे त्यांना हक्क दिले आहेत. जरी पीसीबीने बीसीसीआयची अट मान्य केली तरी, असे वृत्त आहे की भारत पाकिस्तानमध्ये नव्हे तर युएईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपले सामने खेळू शकतो. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) मुख्यालयात एका समारंभात या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन करण्याचे अधिकार प्राप्त केले होते. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात पीसीबीचे प्रमुख झका अश्रफ आणि आयसीसी जनरल कौन्सिल जोनाथन हॉल उपस्थित होते.

पीसीबीने यजमान पदाचे हक्क मिळवले असूनही, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाला पाकिस्तानला पाठविण्याबाबत बीसीसीआय अनुकूल दिसत नाही. बीसीसीआयने पाकिस्तानातील सुरक्षेसंदर्भात शंका उपस्थित केली आहे. याआधीही आशिया चषक २०२३ स्पर्धेत टीम इंडिया हायब्रीड मॉडेलमध्ये खेळली होती. त्यावेळीही या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले होते. भारताने त्यांचे सर्व सामने श्रीलंकेमध्ये खेळले होते. या अंतर्गत, टीम इंडिया अंतिम फेरीत पोहचल्यामुळे तो सामना देखील पाकिस्तानकडून काढून घेण्यात आला होता.

Basit Ali Gives Suggestion to PCB Said Just Copy What India Is Doing
PAK vs BAN: “भारतीय संघाला कॉपी करा…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा PCB ला सल्ला; म्हणाला, “पाकिस्तान क्रिकेट यशस्वी होण्यासाठी भारत…”
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Murder case filed against Shakib Al Hasan
Shakib Al Hasan : धक्कादायक! बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनविरोधात खुनाचा गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Gautam Gambhir Picks All Time World XI He Has Played Against and Includes 3 Pakistan Players
Gautam Gambhir: गौतम गंभीरने निवडली ऑल टाईम इलेव्हन; पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना मिळालं स्थान
Yashasvi Jaiswal Will be Massive Challenge for All of Us Bowlers Said Australia Nathon Layon
IND vs AUS: रोहित, विराट नाही तर ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लॉयनला भारताच्या ‘या’ तरूण खेळाडूचं टेन्शन, इंग्लंडच्या खेळाडूकडून घेतल्या टिप्स
arshad nadeem pakistan
Arshad Nadeem: “भारताचे षडयंत्र…”; अर्शद नदीमच्या विजयानंतर पाकिस्तानच्या ॲथलेटिक्स महासंघाचा आरोप
Former cricketer Ricky Ponting opinion on the Border Gavaskar trophy sport news
भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचे पारडे जड; बॉर्डर-गावस्कर करंडकाबाबत माजी क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंगचे मत
Neeraj Chopra and arshad nadeem net worth
Neeraj Chopra Net Worth: नीरज चोप्राची संपत्ती किती? सुवर्णपदक विजेता पाकिस्तानच्या अरशद नदीमकडे फक्त…

झका अश्रफ आणि संयुक्त अरब अमिराती क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल झारुनी यांच्यात नुकतीच चर्चा झाली. या चर्चेत असे सूचित केले गेले आहे की, जर भारताने या स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला तर युएईमध्ये टीम इंडियाचे सामने खेळवण्याचा पर्याय त्यांच्यासमोर ठेवला जाऊ शकतो. यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या काही सामान्यांचे अधिकार हे संयुक्त अरब अमिरातीमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकतात.

हेही वाचा: IND vs SA: पहिल्या कसोटी सामन्यात कोणाला मिळणार विकेटकीपर म्हणून संधी? के.एल. राहुल की के.एस. भरत, जाणून घ्या

दुबईत झालेल्या त्यांच्या बैठकीत जरी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ला विशिष्ट अजेंड्यात संबोधित केले गेले नसले, तरी युएईकडे पाकिस्तानच्या वारंवार सहकार्याने याची शक्यता निर्माण झाली आहे. हा क्रिकेट जगातील बीसीसीआयचा प्रभाव आणि शक्ती प्रतिबिंबित करते, जिथे त्यांच्या निर्णयांना खूप महत्त्व आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांच्या संभाव्य हस्तांतरणासह महत्त्वपूर्ण निर्णयांवर यामुळे खूप मोठा परिणाम होऊ शकतो.

पीसीबी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यशासाठी वचनबद्ध आहे, परंतु यावर जोर देण्यात आला आहे की जर एखाद्या संघाला पाकिस्तानमधील सुरक्षेबद्दल चिंता असेल तर आयसीसीने एकतर्फी निर्णय घेऊ नये. अलीकडील अहवालात असे सूचित केले गेले आहे की आयसीसीने ही विनंती स्वीकारली आहे आणि क्रिकेट इव्हेंट्सचे भविष्य घडविण्याच्या सहकार्याचे आणि मूल्यांकनाचे महत्त्व यावर लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे.

हेही वाचा: IPL Auction 2024: आयपीएलमुळे सुरक्षा रक्षकाचा मुलगा झाला करोडपती; म्हणाला, “आता देशासाठी खेळेन अन् वर्ल्ड कप…”

यापूर्वी, आठ संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भाग घेत असत, जे एकदिवसीय क्रमवारीत अव्वल -८ मध्ये होते. परंतु यावेळी आयसीसीने नियम बदलले आहेत आणि त्याचा निर्णय एकदिवसीय विश्वचषक २०२३ गुणांच्या गुणतालिकेवरून निश्चित केला. जे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये ८ संघ खेळतील. चार संघांचे दोन गट तयार केले जातील. प्रत्येक गटातील दोन संघ उपांत्य फेरी गाठतील आणि त्यानंतर त्यातील विजयी संघ अंतिम फेरीत पोहचतील. फेब्रुवारी-मार्च २०२५मध्ये पाकिस्तानमध्ये अडीच आठवडे चालणारी १५ सामन्यांची ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.