Parthiv Patel big statement on RCB: आयपीएलमधील प्रसिद्ध संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ या स्पर्धेच्या पहिल्या सीझनपासून खेळत आहे. पण तरीही एकदाही आरसीबीला ट्रॉफी जिंकता आलेली नाही. या लीगमध्ये, RCB ही एक अशी फ्रँचायझी आहे ज्याची फॅन फॉलोइंग सर्वात विश्वासार्ह मानली जाते. संघ जिंको वा हरो, चाहत्यांनी नेहमीच त्यांना साथ दिली आहे. पण सर्वात मोठी निराशा म्हणजे आरसीबीला एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जागतिक क्रिकेटमधील महान खेळाडू या संघाचा भाग असूनही त्यांना एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही. पण आता आरसीबी संघातून खेळलेला पार्थिव पटेलने संघाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा – VIDEO: सचिन तेंडुलकरने धोनीचे नाव कर्णधारपदासाठी सुचवण्यामागचं सांगितलं खरं कारण: म्हणाला, “त्यावेळेस माझी…”

Mohammed Shami on Rohit Sharma and Rahul Dravid
‘मी कोणत्याच विश्वचषकात पहिल्या पसंतीचा खेळाडू नव्हतो…’, मोहम्मद शमीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, मला संघातून…
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Barinder Sran Announces International Retirement
Barinder Sran: धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणाऱ्या भारताच्या वेगवान गोलंदाजाने घेतली निवृत्ती, पहिल्याच्य टी-२० सामन्यात घेतले होते ४ विकेट्स
Deandra Dottin Javelin Gold Medalist Won Cricket Match in Super Over Caribbean Premiere League
VIDEO: सुवर्णपदक विजेत्या भालाफेकपटूने सुपर ओव्हरमध्ये संघाला जिंकून दिला सामना, भारताच्या जेमिमा रॉड्रीग्जने दिली साथ
Australia Mitchell Starc Statement on the Border Gavaskar Trophy sport news
अॅशेसइतकेच महत्त्व! बॉर्डर-गावस्कर करंडकाबाबत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कचे विधान
Gautam Gambhir Picks All Time World XI He Has Played Against and Includes 3 Pakistan Players
Gautam Gambhir: गौतम गंभीरने निवडली ऑल टाईम इलेव्हन; पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना मिळालं स्थान
Vikram Rathour on Rohit Sharmas Game Plan
Rohit Sharma : विसरभोळ्या रोहितबद्दल माजी बॅटिंग कोचचा मोठा खुलासा; म्हणाले, ‘तो फक्त ड्रेसिंग रुममधील ‘ही’ गोष्ट विसरत नाही’
Jasprit Bumrah discusses bowlers are apt for leadership roles
Jasprit Bumrah : ‘कर्णधारपदासाठी गोलंदाजच योग्य कारण ते स्मार्ट…’, जस्सीची खदखद व्यक्त; म्हणाला, ‘आम्ही बॅट मागे लपत नाही…’

RCB च्या संघामध्ये विश्वविध्वंसक ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स, विराट कोहली सारखे खेळाडू संघाचे भाग राहिले आहेत, पण काय कारण आहे की हा संघ चॅम्पियन होऊ शकला नाही. या संघाचा भाग असलेवा आरसीबीचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने एक आश्चर्यकारक खुलासा करत आरसीबी संघाला विजेतेपद का मिळवता आले नाही, हे सांगितले.

हेही वाचा – Rohit Sharma: T20WC मधील अखेरच्या ५ षटकांत रोहित शर्माच्या मनात नेमकं काय सुरू होत? उत्तर देताना म्हणाला…

आरसीबीने ट्रॉफी न जिंकण्याचे मुख्य कारण म्हणजे स्टार खेळाडूंना जास्त महत्त्व देणे, असे पार्थिव पटेलचे मत होते. संघाबाबत एका पोडकास्टमध्ये बोलताना पार्थिव पटेल म्हणाला, “मी चार वर्षे आरसीबीसाठी खेळलो आहे. तिथे नेहमीच संघापेक्षा जास्त एखाद्या खेळाडूला महत्त्व दिले जायचे. या फ्रँचायझीमध्ये नेहमीच स्टार्सना प्राधान्य दिले जात होते. मला संघभावना कधी दिसली नाही. मी जेव्हा या फ्रँचायझीमध्ये होतो तेव्हा संघ म्हणजे फक्त विराट कोहली, ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलयर्स होते. त्यामुळे संघ संस्कृती कधीच नव्हती, त्यामुळे आरसीबीला कधी आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

हेही वाचा – Hardik Pandya: कर्णधार रोहितची शर्माच्या जागी कोण? सूर्यकुमार का हार्दिक? बीसीसीआयचा खल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अनेकदा शानदार कामगिरी केली आहे. पण तरीही ट्रॉफीपर्यंत पोहोचण्यात संघ कायमचं अयशस्वी राहिला आहे. आयपीएल २०२४मध्ये सलग सहा सामने गमावूनही आरसीबीने आश्चर्यकारक कमबॅक करत प्लेऑफमध्ये आपली जागा बनवली, पण उपांत्य फेरीतील सामना गमावला. आयपीएलमध्ये आतापर्यंत या संघाने तीनदा अंतिम फेरी गाठली, परंतु दुर्दैवाने तिन्ही वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या लीगमध्ये, फ्रँचायझी ८ वेळा ग्रुप स्टेजमधून बाहेर पडली होती, तर ६ वेळा प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यश मिळवले होते, परंतु त्यांना एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही.