कराची : भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील केंद्रांची चाचपणी करण्यासाठी पाकिस्तानकडून सुरक्षा पथक पाठवले जाणार आहे. सुरक्षेची खात्री पटल्यानंतरच पाकिस्तान सरकारकडून राष्ट्रीय संघाला या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता हिरवा कंदील देण्यात येईल.

ईदच्या सुट्टीनंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) नवीन अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर एकदिवसीय विश्वचषकाचे सामने ज्या स्टेडियममध्ये होणार आहेत, तेथील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पथक पाठवण्यात येईल. मात्र, हे पथक कधी पाठवायचे याचा निर्णय सरकारसह परराष्ट्र आणि गृहमंत्रालय घेईल, असे आंतर-प्रांतीय समन्वय (क्रीडा) मंत्रालयातील एका सूत्राने सांगितले.

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
Dhavalsingh Mohite Patil resigned as district president due to Sushilkumar and Praniti Shindes arbitrariness
सोलापुरात काँग्रेस पक्ष नसून शिंदे काँग्रेस; धवलसिंह मोहिते यांचा आरोप करीत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
Rajender Meghwar Pakistans first Hindu cop
पाकिस्तानातील पहिले हिंदू पोलीस अधिकारी; कोण आहेत राजेंद्र मेघवार?
Ladki Bahin Yojana Updates By Eknath Shinde
Ladki Bahin Yojana : शिंदे दादा आमचा डिसेंबरचा हप्ता कधी देणार? उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच लाडक्या बहिणीचा एकनाथ शिंदेंना सवाल
eknath shinde took oath as deputy cm with ajit pawar and devendra fadnavis cm
Eknath Shinde: शपथविधीच्या दोन तास आधी एकनाथ शिंदे झाले राजी; पडद्यामागे नेमकं असं काय घडलं?

‘‘एकदिवसीय विश्वचषकातील पाकिस्तानचे सामने ज्या केंद्रांवर होणार आहे, तेथील सुरक्षा आणि व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ‘पीसीबी’चे पथक भारतात जाईल,’’ असे या सूत्राकडून सांगण्यात आले. हे पथक अहमदाबाद, चेन्नई, बंगळूरु, हैदराबाद आणि कोलकाता येथील केंद्रांची चाचपणी करेल. भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यामधील सामना १५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील १ लाख ३२ हजार आसनसंख्या असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

‘‘भारतामध्ये आपला संघ पाठवण्यापूर्वी क्रिकेट मंडळाला सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. मग सरकारकडून सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी भारतामध्ये पथक पाठवले जाते. ही नेहमीचीच प्रक्रिया आहे. हे पथक तेथील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करेल. तसेच त्यांच्यासह सामने ज्या ठिकाणी होणार आहेत, तेथे जाऊन सुरक्षा आणि अन्य व्यवस्थेची चाचपणी करेल,’’ असेही या सूत्राने सांगितले.

या पथकाला ज्या केंद्रांवर सामने होणार आहेत, तेथील सुरक्षेबाबत पूर्ण खात्री नसल्यास तसे ते आपल्या अहवालात नमूद करतील.

Story img Loader