सोलापूर : सोलापुरात इंदिरा गांधी स्टेडिअमवर सुरू झालेल्या महाराष्ट्र विरूध्द मणिपूर रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी मणिपूरचा संघ अवघ्या १३७ धावांमध्ये गारद झाला. महाराष्ट्राच्या हितेश वाळुंजने ५ बळी तर प्रदीप दाढे याने ४ बळी घेऊन चांगली कामगिरी केली. महाराष्ट्राचा संघ ३ गडी बाद १२३ धावा़वर खेळत असून यात कर्णधार केदार जाधव आणि सिध्देश वीर यांच्यात झालेली ९४ धावांची भागीदारी महाराष्ट्राला सामन्यावर पकड घेणारी ठरली.

हेही वाचा >>> ICC Awards 2023 : विराट किंवा जडेजा ठरु शकतात वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, ‘या’ दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंचाही समावेश

Ranji Trophy Quarterfinal Mumbai Squad Announced Suryakumar Yadav Shivam Dube to play vs Haryana
Ranji Trophy: रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी मुंबईच्या संघात मोठे बदल, टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूंना दिली संधी; कसा आहे संघ?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Sachin Tendulkar CK Naydu Lifetime Achievement Award by BCCI in Naman Awards 2023 24
BCCI Naman Awards: सचिन तेंडुलकरला जीवनगौरव पुरस्कार! BCCI ने केला खास सन्मान; पाहा ऐतिहासिक क्षणाचा VIDEO
Ranji Trophy 2025 Mumbai defeated Meghalaya by an innings and 456 runs
Ranji Trophy 2025 : मुंबईचा मेघालयवर दणदणीत विजय; ८ विकेट्स आणि ८४ धावांसह शार्दूल ठाकूरचे महत्त्वपूर्ण योगदान
Ranji Trophy 2025 Virat Kohli Declines Team Managers offer during Ranji Trophy Camp wins gearts for his simplicity vbm 97
Ranji Trophy 2025 : विराट कोहलीने रणजी सामन्यापूर्वी ‘या’ कृतीने जिंकली सर्वांची मनं, सर्वत्र होतय कौतुक
Ranji Trophy 2025 Shardul Thakur scored a century for Mumbai against Jammu and Kashmir
Ranji Trophy 2025 : शार्दुल ठाकूरचं दमदार शतक… पुन्हा एकदा मुंबईला तारलं
Ranji Trophy 2025 Yashasvi Jaiswal Shreyas Iyer Shivam Dube flop in Mumbai vs Jammu Kashmir match
Ranji Trophy 2025 : यशस्वी-श्रेयस आणि शिवम दुबे सलग दुसऱ्या डावात अपयशी, जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजांपुढे टेकले गुडघे
Ranji Trophy Maharashtra Ankit Bawne Handed One Match Ban After Refusing To Leave The Field Against Services
Ranji Trophy: महाराष्ट्राच्या खेळाडूवर रणजी ट्रॉफीत एका सामन्याची घातली बंदी, काय आहे नेमकं प्रकरण?

सोलापुरात तब्बल २९ वर्षांनी रणजी क्रिकेट सामना खेळला जात आहे. महाराष्ट्र व मणिपूरदरम्यान खेळण्यात येणा-या या सामन्यात नाणेफेक जिंकून मणिपूरने प्रथम फलंदाजी स्वीकारली. दुपारी जेवणासाठीच्या विश्रांतीपर्यंत मणिपूरने ५ गडी गमावून ९० धावा केल्या. त्यानंतर महाराष्ट्राच्या भेदाक गोलंदाजीपुढे मणिपूरचा डाव उर्वरीत   अवघ्या ४७ धावांमध्ये संपुष्टात आला. हितेश वाळुंज याने ३३ धावांच्या मोबदल्यात ५ गडी टिपले तर त्यास योग्य साथ देताना प्रदीप दाढे यानेही ३५ धावा देऊन ४ गडींना तंबूत पाठविले. महाराष्ट्राकडून सिध्देश वीर आणि ओंकार खाटपे हे फलंदाज सलामीला आले. परंतु ओंकार अवघ्या १० धावांतच झटपट बाद होऊन तंबूत परतला. त्यानंतर नौशाद शेख (५ धावा) यानेही निराशा केली, मात्र त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला कर्णधार केदार जाधव याने सिध्देश वीरसोबत ९४ धावांची भागीदारी करून महाराष्ट्राला मजबूत स्थितीत आणले. सिध्देश ५८ धावांवर बाद झाला. तर केदार जाधव  ४९ धावांवर नाबाद खेळत आहे. मणिपूरच्या बिष्णोजित याने ४१ धावांच्या मोबदल्यात महाराष्ट्राचे दोन गडी बाद केले. तर किशन संघा याने ३८ धावांत एक गडी बाद केला.

Story img Loader