Assam Team withdraw appeal against Ajinkya Rahane : आसाम आणि मुंबई यांच्यात सुरू असलेल्या रणजी सामन्यादरम्यान, अजिंक्य रहाणेला त्याच्या १६ वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल आऊट देण्यात आले. मात्र, काही वेळाने आसाम संघाने अपील मागे घेतल्यानंतर रहाणेने पुन्हा फलंदाजी केली. एकेकाळी मुंबईचा संघ चार गडी गमावून १०२ धावा करून खेळत होता आणि रहाणेची वैयक्तिक धावसंख्या १८ धावा होती.

यानंतर त्याने चेंडू मिड-ऑनच्या दिशेने वळवून सिंगल घेण्याचा प्रयत्न केला पण त्याचा साथीदार शिवम दुबेने धाव घेण्यास नकार दिला. रहाणे बराच पुढे आला होता आणि आसामचा कर्णधार दानिश दासने चेंडू उचलून कीपरच्या दिशेने फेकला, पण तो क्रिझवर परतण्याचा प्रयत्न करणाऱ्या रहाणेला लागला. यानंतर आसामच्या सर्व खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल आऊटचे अपील केली आणि मैदानी पंचांनीही हे अपील मान्य केली.

Ranji Trophy Quarterfinal Mumbai Squad Announced Suryakumar Yadav Shivam Dube to play vs Haryana
Ranji Trophy: रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी मुंबईच्या संघात मोठे बदल, टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूंना दिली संधी; कसा आहे संघ?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Ranji Trophy 2025 Mumbai defeated Meghalaya by an innings and 456 runs
Ranji Trophy 2025 : मुंबईचा मेघालयवर दणदणीत विजय; ८ विकेट्स आणि ८४ धावांसह शार्दूल ठाकूरचे महत्त्वपूर्ण योगदान
Ranji Trophy 2025 fan entered at Arun Jaitley Stadium ground to meet Virat Kohli during Delhi vs Railway match
Ranji Trophy 2025 : विराट कोहलीला भेटण्यासाठी चाहत्याने भेदला सुरक्षा रक्षकांचा घेरा, VIDEO होतोय व्हायरल
Shardul Thakur take hat trick against Meghalaya for Mumba in Ranji Trophy 2025 match
Ranji Trophy 2025 : शार्दुल ठाकुरच्या भेदक गोलंदाजीसमोर मेघालयने टेकले गुडघे! नोंदवला रणजी ट्रॉफी इतिहासातील लाजिरवाणा विक्रम
Ranji Trophy 2025 Virat Kohli Declines Team Managers offer during Ranji Trophy Camp wins gearts for his simplicity vbm 97
Ranji Trophy 2025 : विराट कोहलीने रणजी सामन्यापूर्वी ‘या’ कृतीने जिंकली सर्वांची मनं, सर्वत्र होतय कौतुक
Ranji Trophy 2025 Jammu Kashmir create history after beat Mumbai by 5 wickets in Elite group match
Ranji Trophy 2025 : जम्मू-काश्मीरने घडवला इतिहास! रोहित-यशस्वी रहाणे असतानाही मुंबईचा रणजीत दारूण पराभव
Shreyas Iyer argues with umpires over controversial dismissal Ajinkya Rahane does interferen in Ranji Trophy 2025
Shreyas Iyer Controversy : आऊट झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि अंपायरमध्ये जुंपली, अजिंक्य रहाणेला करावा लागला हस्तक्षेप

या निर्णयानंतर लगेचच पंचांनी चहाचा ब्रेकही जाहीर केला. आता आसामने पहिल्या डावात केलेल्या ८४ धावांना प्रत्युत्तर देताना मुंबईचे पाच फलंदाज केवळ १०५ धावांवर बाद झाले. मात्र, आसामने चहापानाच्या वेळी अपील मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि पंचांनाही याबाबत माहिती दिली.

हेही वाचा – Naushad Khan : आनंद महिंद्रांनी पुन्हा जिंकली सर्वांची मनं, सर्फराझ खानच्या वडिलांना खास ‘गिफ्ट’ देण्याची केली घोषणा

आऊट असूनही रहाणे पुन्हा फलंदाजीला आला –

नियमांनुसार, पुढील चेंडू टाकण्यापूर्वी बाद करण्याचे अपील मागे घ्यावे लागते आणि अंपायर जेव्हा ते स्वीकारतील तेव्हाच फलंदाज फलंदाजीला परत येऊ शकतो. सुदैवाने रहाणे बाद झाल्यानंतर चहापानाचा ब्रेक घेण्यात आला आणि त्याच दरम्यान आसाम संघाने आपला निर्णय बदलला. परिणामी, २० मिनिटांनी रहाणे पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात आला. मात्र, रहाणेला या जीवदानाचा फायदा उठवता आला नाही आणि केवळ चार धावा जोडल्यानंतर २२ धावांवर तो बाद झाला.

रहाणेने शिवम दुबेसोबत अर्धशतकी भागीदारी केली –

अजिंक्य रहाणे फलंदाजीला आला तेव्हा मुंबईचा संघ चार गडी गमावून ६० धावांवर खेळत होता. यानंतर रहाणेने शिवम दुबेसोबत अर्धशतकी भागीदारी केली. रहाणेचा आतापर्यंतचा रणजी हंगाम निराशाजनक राहिला असून त्याने आठ डावांत १६.०० च्या सरासरीने केवळ ११२ धावा केल्या आहेत. आसाम पहिल्या डावात केवळ ८४ धावांवर सर्वबाद झाला. दुखापतीनंतर पुनरागमन करताना शार्दुल ठाकूरने २१ धावांत सहा बळी घेतले आणि आसामची संपूर्ण फलंदाजी उद्ध्वस्त केली.

Story img Loader