India squad announced for ODI series against Australia: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात फारसे बदल करण्यात आलेले नाहीत. आशिया चषक स्पर्धेत खेळलेल्या बहुतांश खेळाडूंना या मालिकेत संधी देण्यात आली आहे. मात्र, रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह हार्दिकसारख्या खेळाडूंना पहिल्या दोन वनडेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघातील सर्वात आश्चर्यकारक नाव म्हणजे रविचंद्रन अश्विन. अश्विनशिवाय ऋतुराज गायकवाडलाही संधी देण्यात आली आहे, मात्र तो आशियाई क्रीडा स्पर्धेतही संघाचे नेतृत्व करणार आहे. अशा परिस्थितीत त्याला या मालिकेत संधी मिळणे महत्त्वाचे आहे.

या खेळाडूंच्या यादीत ३७ वर्षीय अश्विनचे ​​नाव आश्चर्यकारक आहे. २०१७ मध्ये त्याला भारताच्या एकदिवसीय संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर तो फक्त दोनच एकदिवसीय सामने खेळला आहे. २०२२ मध्ये त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली होती. अश्विन कसोटीत भारताचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला असला, तरी एकदिवसीय आणि टी-२० मध्ये तो फार कमी सामने खेळला आहे.

IND vs BAN 3rd T20I Sanju Samson credited captain Suryakumar Yadav and coach Gautam Gambhir
IND vs BAN : ‘मी खूप वेळा अपयशी ठरलो आहे पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनच्या प्रतिक्रियेने टीम इंडियासह चाहत्यांची जिंकली मनं
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
New Zealand Captain Tom Latham Statement on Team India Ahead of IND vs NZ Test Series
IND vs NZ: “…तर आम्ही भारतावर विजय मिळवू”, भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी न्यूझीलंडच्या कर्णधाराने बनवली जबरदस्त रणनिती, हिटमॅन चक्रव्यूह भेदणार?
Rohit Sharma Likely To Miss IND vs AUS One Test in Australia Border Gavaskar Trophy
Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काही कसोटींना मुकणार? काय आहे कारण
Rohit Sharma Big Reveals about t20 world cup final match
‘ऋषभ पंतच्या त्या चलाखीमुळं टी२० विश्वचषक जिंकलो’, तीन महिन्यांनंतर रोहित शर्माचा मोठा खुलासा
batsman jemima rodrigues on t20 world cup
जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीसाठी परिस्थितीनुसार खेळणे आवश्यक! ट्वेन्टी२० विश्वचषकाबाबत जेमिमाचे मत
WTC Points Table Sri Lanka Beat New Zealand and Improve PCT on 3rd Spot
WTC Points Table: श्रीलंकेमुळे ऑस्ट्रेलियाचा WTC अंतिम फेरीचा मार्ग खडतर; कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघावर मिळवला एकतर्फी विजय
Bangladesh super fan Tiger Robi claims he was assaulted by the Kanpur crowd on Day 1
Bangladesh Super Fan Beaten Up: कानपूर कसोटीदरम्यान बांगलादेशी चाहत्याला मारहाण? पत्रकार म्हणाले, “पहिल्या कसोटीतही त्याने सिराजला…”

२०१७ मध्ये एकदिवसीय आणि टी-२० संघातून वगळल्यानंतर, त्याने २०२१ टी-२० विश्वचषक खेळला, परंतु त्याला तीन सामन्यांमध्ये सहा विकेट घेता आल्या, पण टीम इंडियाला उपांत्य फेरीतही प्रवेश मिळवता आला नाही. यानंतर अश्विनला भारतीय टी-२० संघात नियमित संधी मिळाली, पण तो १६ सामन्यांमध्ये केवळ १४ विकेट घेऊ शकला. त्याचा इकॉनॉमी रेट सातच्या वर होता. अशा परिस्थितीत २०२२ च्या टी-२० विश्वचषकानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. २०२२ च्या टी-२० विश्वचषकातील सहा सामन्यांमध्ये त्याने सहा विकेट घेतल्या आणि त्याचा इकॉनॉमी रेट आठपेक्षा जास्त होता. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने एक महत्त्वाची धाव काढली, पण याशिवाय फलंदाजीत तो काही विशेष करू शकला नाही. आता त्याला वनडे वर्ल्ड कपमध्ये पुन्हा संधी मिळू शकते.

हेही वाचा – IND VS AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, केएल राहुलकडे नेतृत्व, तीन खेळाडूंचं पुनरागमन

अश्विनला संधी का मिळत आहे?

एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे, जिथे बहुतेक मैदानातील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करते. भारताच्या सध्याच्या विश्वचषक संघात तीन फिरकी गोलंदाज आहेत. तिघेही डाव्या हाताचे आहेत. जडेजा आणि अक्षर प्रत्येक बाबतीत जवळपास सारखेच आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा फिरकी खेळपट्टीवर तीन फिरकी गोलंदाजांना संधी दिली जाईल, तेव्हा अक्षर आणि जडेजा यांना एकत्र खेळणे कठीण होईल. आशिया चषकातही अक्षर काही विशेष करू शकला नाही आणि कर्णधाराने त्याला षटकेही पूर्ण करायला लावली नाहीत, असे दिसून आले. आता अक्षर दुखापतग्रस्त असल्याने त्याला तंदुरुस्त होणे कठीण आहे. अशा स्थितीत रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांना अश्विनला तिसरा फिरकीपटू पर्याय म्हणून तयार ठेवायचा आहे.

जर अक्षर पटेल वेळेत तंदुरुस्त झाला नाही, तर त्याच्या जागी अश्विनचा विश्वचषक संघात समावेश केला जाऊ शकतो. अश्विनही बॅटने उपयुक्त खेळी खेळण्यास सक्षम आहे. संघात त्याच्या आगमनामुळे फिरकी गोलंदाजीत विविधता येईल. तो विशेषतः डावखुऱ्या फलंदाजांना त्रास देतो. याच कारणामुळे संघ व्यवस्थापन त्याच्यावर सट्टा लावत आहे.

हेही वाचा – World Cup 2023: ‘दिल कुछ कहता है और दिमाग…’; भारताच्या विश्वचषक जिंकण्याच्या प्रश्नावर कपिल देव यांचे वक्तव्य

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ (पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी) –

लोकेश राहुल (कर्णधार/विकेटकीपर) शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, तिलक वर्मा, प्रसिध्द कृष्णा, रविंद्रन, रविंद्रन आणि वॉशिंग्टन सुंदर.

तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, हार्दिक पाड्या (उपकर्णधार), विराट कोहली, कुलदीप यादव, अक्षर पटेल (फिटनेसबद्दल शंका), रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.