बांगलादेशातील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) विचारणा केली होती. मात्र, आपण हा प्रस्ताव फेटाळून लावल्याचे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिलांची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेशात नियोजित आहे. मात्र, सध्या तेथील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे ‘आयसीसी’ला यजमानपदासाठी अन्य पर्यायांचा विचार करणे भाग पडले आहे.

‘‘महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत ‘आयसीसी’ने ‘बीसीसीआय’ला विचारणा केली. मात्र, मी स्पष्ट नकार दिला. आपल्याकडे त्या काळात (ऑक्टोबरमध्ये) मान्सून सुरू असेल. तसेच पुढील वर्षी महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धाही भारतात होणार आहे. त्यामुळे सलग दोन विश्वचषकांचे आयोजन करण्यास मी उत्सुक नव्हतो,’’ असे शहा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>Independence Day 2024: महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैनाने १५ ऑगस्ट रोजीच का जाहीर केली निवृत्ती? रैनाने केला मोठा खुलासा

तसेच आगामी क्रिकेट हंगामात भारतामध्ये दिवस-रात्र कसोटी सामन्याचे आयोजन होणार नसल्याचेही शहा यांनी सांगितले. ‘‘आपल्याकडे दिवस-रात्र कसोटी सामना दोन दिवसांतच संपतो. त्यामुळे प्रेक्षक, प्रसारणकर्ते यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. आम्हाला या गोष्टींचाही विचार करावा लागतो,’’ असे शहा म्हणाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rejection of organizing women twenty20 world cup jai shah sport news amy