Rishabh Pant Statement on Rishabh Pant: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटीला सिडनीमध्ये सुरुवात झाली आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या सामन्यात खेळत आहे. कारण रोहित शर्माने या कसोटीत विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्याने तो सिडनी कसोटीत प्लेईंग इलेव्हनच्या निवडीसाठी उपलब्ध नव्हता. आता रोहितला वगळल्याबाबत ऋषभ पंतचे विधान समोर आले आहे. रोहित शर्माचा हा निर्णय भावुक असल्याचे ऋषभ पंत म्हणाला आहे.

सिडनी कसोटीत नाणेफेकीच्या वेळीस जसप्रीत बुमराहने प्लेईंग इलेव्हनबाबत सांगताना रोहित शर्माबाबत सांगितले. तेव्हा बुमराह म्हणाला, संघाचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात विश्रांती घेण्याचा निर्णय घेत नेतृत्त्वाचं एक उत्तम उदाहरण दिलं आहे. यावरून संघातील एकजूट दिसून येते. जे संघाच्या हिताचं असेल तोच निर्णय घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.

What Historian Inderjit Sawant Said?
Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकरांनी महाराष्ट्राचं मन दुखावलं आहे, माफी मागितली पाहिजे; इतिहासकार इंद्रजीत सावंत यांची मागणी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
Yuvraj Singh Message to Abhishek Sharma After Historic Century Reveals His Father
Yuvraj Singh Abhishek Sharma: “हे विसरू नकोस की तुला…” अभिषेक शर्माला शतकानंतरही युवराज सिंगने दिल्या सूचना, अभिषेकच्या वडिलांनी सांगितलं काय होता मेसेज
Abhishek Sharma Credits Suryakumar Yadav Hardik Pandya Axar Patel For his Fastest Century
IND vs ENG: “तिघांनीही मैदानावर आल्यावर मला…”, अभिषेक शर्माने भारताच्या ‘या’ तीन खेळाडूंना दिलं शतकाचं श्रेय; सामन्यादरम्यान काय घडलं?
Shahid Kapoor
“मी आत्मसन्मान गमावला…”, लग्नाआधीच्या रिलेशनशिपबद्दल शाहिद कपूर म्हणाला, “हृदय तुटल्याने…”
Shahid Kapoor Mira Rajput
“तू ‘जब वी मेट’मधील आदित्य सारखा नाही…”; पत्नी मिरा राजपुतची तक्रार, शाहिद कपूर म्हणाला, “आनंदी हो…”
Ravi Bishnoi Reveals Inside Chat With Tilak Varma During Match Winning Partnership vs England
IND vs ENG: “तो सेट झाला होता आणि मी घाईघाईत…”, तिलक वर्मा-रवी बिश्नोईमध्ये अखेरच्या षटकांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?

हेही वाचा – IND vs AUS: “तुझा प्रॉब्लेम काय आहे?”, कॉन्टासने घातला बुमराहशी वाद, मधल्या मध्ये गेला ख्वाजाचा बळी; VIDEO व्हायरल

कर्णधार रोहित शर्माच्या संघाबाहेर होण्याच्या निर्णयाबाबत बोलताना ऋषभ पंत म्हणाला, “हा एक भावुक करणारा निर्णय आहे, यात शंकाच नाही. कारण तो गेल्या बऱ्याच काळापासून संघाचा कर्णधार आहे. आम्ही त्याच्याकडे संघाचे नेतृत्त्व करणारा एक नेता म्हणून पाहत आलो आहेत. पण असे काही निर्णय असतात ज्यामध्ये आमचा सहभाग नसतो आणि हा मॅनेजमेंटचा निर्णय आहे. मी त्या चर्चेचा भाग नव्हतो, त्यामुळे याबाबत जास्त काही सांगू शकणार नाही.”

हेही वाचा – IND vs AUS: बुमराहचा जळता कटाक्ष अन् भारताचं आक्रमक सेलिब्रेशन! कॉन्स्टासने वाद घातल्यानंतर ख्वाजाच्या विकेटचा VIDEO व्हायरल

रोहित शर्माच्या फॉर्मवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. आणि तेच त्याला संघातून वगळण्याचे कारण ठरले ृ. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेत रोहित शर्माने ५ डाव खेळले, ज्यात त्याने ६.२० च्या सरासरीने केवळ ३१ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो सर्वात कमी फलंदाजीची सरासरी असलेला कर्णधार बनला आहे.

रोहित शर्माला वगळल्यानंतरही भारताची फलंदाजी बाजू पूर्णपणे ढासळली. सिडनी कसोटीत भारतीय संघ नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत १८५ धावांवर पहिल्याच दिवशी सर्वबाद झाला. ऋषभ पंतने उत्कृष्ट फलंदाजी करत ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर जसप्रीत बुमराहनेही २२ धावांची खेळी करत भारताच्या धावांमध्ये भर घातली. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावात दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर उस्मान ख्वाजाला बाद करत १ विकेट घेतली.

Story img Loader