Rohit Sharma’s statement on DRS: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये टीम इंडियाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. भारताने सलग ७ विजयांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने डीआरएसचा केलेला वापर संघासाठी खूप फायदेशीर ठरला आहे, असे असतानाही सामन्यानंतर रोहित शर्माने डीआरएसवर मोठे वक्तव्य केले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, भारतीय संघासाठी गोलंदाजी करताना मी डीआरएस घेणार नाही. रोहित शर्मा असं का म्हणाला? ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केएल राहुलच्या हुशारीमुळे टीम इंडियाला मिळाली विकेट –

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान भारतीय संघ गोलंदाजी करत असताना श्रीलंकेचा एक फलंदाज बाद झाला, पण कोणीही याबाबत फारशी अपील केली नाही. त्यामुळे भारतीय कर्णधार रोहित शर्मासह गोलंदाजांना खेळाडू नाबाद असल्याचे जाणवले. त्यानंतर विकेटच्या मागून उपकर्णधार केएल राहुलने रोहित शर्माला सांगितले की, फलंदाज बाद आहे, डीआरएस घ्या. राहुलच्या सांगण्यावरून रोहितने शेवटच्या क्षणी डीआरएस घेतला. तिसर्‍या अंपायरने जेव्हा चेक केले, तेव्हा समजले की फलंदाज खरोखरच बाद होता. राहुलचा डीआरएस घेण्याचा निर्णय खूपच महत्त्वाचा होता. कारण फलंदाज बाद होईल याची कोणालाच खात्री नव्हती, पण केएल राहुलच्या हुशारीमुळे भारताला विकेट मिळाली.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर जेव्हा रोहितला रिव्ह्यू घेण्याच्या प्रक्रियेबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितले की, तो हा निर्णय गोलंदाज आणि यष्टीरक्षकावर सोडतो. तो म्हणाला, “मी हा निर्णय गोलंदाज आणि यष्टीरक्षकावर सोडला आहे आणि मला विश्वास ठेवू शकेल असे खेळाडू शोधायचे आहेत. मला माहित आहे की डीआरएसचा निर्णय कोणाच्याही पक्षात जाऊ शकतो. आज आम्हाला एक योग्य आणि एक चुकीचा रिव्ह्यू मिळाला.”

हेही वाचा – World Cup 2023: टीम इंडियात परतण्यापूर्वी ऋषभ पंतने घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन, पाहा VIDEO

आता केएल राहुल डीआरएस घेईल – रोहित शर्मा

या सामन्यानंतर रोहित शर्माने केएल राहुलच्या डीआरएस घेण्याच्या निर्णयाचे कौतुक केले. रोहित म्हणाला की, ‘केएल राहुल हा एक जबाबदार खेळाडू आहे, तो फलंदाजांचे विकेटच्या मागून चांगले निरीक्षण करु शकतो की खेळाडू बाद होऊ शकतो की नाही.’ यावर रोहित मस्करी करताना म्हणाला की, ‘येथून पुढे उपकर्णधार केएल राहुल आणि गोलंदाज आपसात समन्वय साधून डीआरएसची मागणी करू शकतात.’ रोहित पुढे म्हणाला की, ‘आता मी माझ्या इच्छेने डीआरएसची मागणी करणार नाही. गोलंदाज आणि केएल राहुलला वाटत असेल की डीआरएस घ्यावा, तर डीआरएस घेतला जाईल.’

हेही वाचा – IND vs SL: मोहम्मद शमीच्या डोक्यावर बॉल ठेवण्याच्या कृतीबाबत शुबमन गिलकडून खुलासा, म्हणाला, “ड्रेसिंग रुम…”

भारताने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी (२ नोव्हेंबर) श्रीलंकेवर ३०२ धावांनी विजय मिळवला. टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. त्याने विश्वचषकाच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवला. यापूर्वी २००७ मध्ये बर्म्युडाचा २५७ धावांनी पराभव केला होता. भारताचा पुढील सामना आता रविवारी (५ नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit said that now i will not demand drs on my own will vbm
Show comments