IND vs AUS, World Cup: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया आपल्या विश्वचषक मोहिमेची विजयी सुरुवात करू इच्छित आहे. भारताने शेवटची आयसीसी ट्रॉफी २०१३ मध्ये जिंकली होती. अशा परिस्थितीत आयसीसी ट्रॉफीचा दशकभराचा दुष्काळ संपवण्याची जबाबदारी रोहित शर्माच्या संघावर आहे. या स्पर्धेतील पहिला सामना खेळण्यापूर्वी रोहित शर्माने म्हटले आहे की, “भारतीय खेळाडू होणे सोपे नाही. चाहत्यांच्या अपेक्षा खूप दडपण निर्माण करतात.” याबरोबरच त्याने असेही सांगितले की, “त्याच्या संघात मॅच विनर्स आहेत ज्यांना दबावाच्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे हे माहित आहे.”

रोहित पुढे म्हणाला, “आम्ही भारतीय क्रिकेटपटू आहोत. आम्हाला दबावाच्या परिस्थितीतून जावे लागते. मला या संघात अनेक मानसिकदृष्ट्या मजबूत असे खेळाडू दिसत आहेत, जे त्यांच्या कारकिर्दीत अडचणीतून गेले आहेत. त्यांच्यापैकी कोणीही इतक्या सहज हा पल्ला गाठू शकला नाही. ते सगळे एका वाईट काळातून गेले आहेत. त्यांनी त्यांचा कठीण काळ सहन केला आहे आणि आज त्यांनी जे काही मिळवले, ते त्यांच्या मेहनत, श्रम आणि कष्टाच्या बळावर कमवले.”

Rohit Sharma Statement on India Win and His Century in Cuttack IND vs ENG 2nd ODI
IND vs ENG: “इंग्लंडच्या गोलंदाजांनी माझ्या शरीराच्या दिशेने…”, रोहित शर्माचं शतकाबाबत मोठं वक्तव्य; भारताच्या विजयानंतर काय म्हणाला?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Rohit Sharma Century in IND vs ENG 2nd ODI Match in just 76 Balls
Rohit Sharma Century: रोहित शर्माचे झंझावाती शतक! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतासाठी आनंदाची बातमी, वादळी फलंदाजी करत ट्रोलर्सची केली बोलती बंद
IND vs ENG Gautam Gambhir may be unhappy with Rohit Sharma duos intense chat triggers speculations after video viral
IND vs ENG : गौतम गंभीर रोहित शर्मावर नाराज? सामन्यानंतरचा VIDEO व्हायल झाल्यानंतर चर्चेला उधाण
Sunil Gavaskar slam KL Rahul gets out trying to help Shubman Gill get a century in IND vs ENG 1st ODI
IND vs ENG : “हा सांघिक खेळ आहे आणि तुम्हाला…”, गिलच्या शतकाच्या नादात बाद झालेल्या राहुलवर गावस्कर संतापले
Shreyas Iyer Reveals How He Replaces Virat Kohli on Rohit Sharma Phone Call in India Playing XI
IND vs ENG: “मी रात्री चित्रपट बघत होतो अन् रोहितचा फोन…”, श्रेयस अय्यरने सांगितलं कसं झालं टीम इंडियात पुनरागमन, सामन्यानंतर काय म्हणाला?
IND vs ENG Fans asked Rohit Sharme retire from the ODI after he dismissed for just 2 runs in Nagpur
IND vs ENG : ‘रोहित शर्माला निवृत्ती घ्यायला सांगा…’, दोन धावांवर बाद झाल्यानंतर चाहत्यांनी हिटमॅनला केले ट्रोल
IND vs ENG Kevin Pietersen statement on Virat Kohli and Rohit Sharma During the discussion of Retirement
IND vs ENG : ‘विराट-रोहित रोबो नाहीत…’, वनडे मालिकेपूर्वी इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘लोकांनी त्यांना…’

भारताचा कर्णधार पुढे म्हणाला, “१६ वर्षाच्या या कारकिर्दीत मला या कठीण प्रसंगातून कसे जायचे हे शिकवले. अनुभव खूप काही शिकवतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मोठ्या जोखमीच्या खेळात दबावाला सामोरे जाणे. १६ वर्षांच्या क्रिकेटने मला चांगल्या-वाईट क्षणांना कसे सामोरे जावे हे समजावले. संघातील सहकाऱ्यांची साथ आणि कुटंबाची मदत यामुळे मी हे सर्व करू शकलो.”

हेही वाचा: IND vs AUS Live Score, WC 2023: विराट कोहली-के.एल. राहुल यांची शानदार अर्धशतके! टीम इंडियाने मजबूत स्थितीत

हिटमॅन म्हणाला की, “रोहितला समजले आहे की दबाव हाताळणे हे एक अद्वितीय कौशल्य आहे आणि प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने यावर मत देईल. मला खात्री आहे की स्पर्धेच्या काही टप्प्यांवर काही खेळाडू दडपणातून जातील, संघ दबाव झेलून चांगली कामगिरी करेल. पण इथेच आपल्याला मानसिकदृष्ट्या मजबूत खेळाडूंची गरज आहे.”

सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात काय झाले?

ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध ४९.३ षटकांत १९९ धावांत गारद झाला. हा सामना जिंकण्यासाठी भारताला ३०० चेंडूत केवळ २०० धावा करायच्या आहेत. मात्र, खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नाही. अशा स्थितीत भारताला थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ४६ धावा केल्या. वॉर्नरनेही ४१ धावांची खेळी खेळली. अखेरीस स्टार्कने २८ धावांचे योगदान दिले. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. सिराज, हार्दिक आणि अश्विनने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

हेही वाचा: IND vs AUS, World Cup: टीम इंडिया विश्वचषकात अडचणीत! शुबमन गिल पुढील सामन्यातूनही बाहेर होण्याची शक्यता, जाणून घ्या

लोकेश राहुलने ७२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील १६वे अर्धशतक आहे. त्याने विराट कोहलीबरोबर शानदार भागीदारी करत टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन केले आहे. आता मोठा डाव खेळून टीम इंडियाला विजय मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न असेल. ३० षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात १२० धावा आहे.

Story img Loader