IND vs ENG ODI Series Rohit Sharma Press Conference: उद्यापासून म्हणजेच ६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या भारत वि इंग्लंड वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळवला जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ही मालिका फारच महत्त्वाची असणार आहे. शिवाय रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर या मालिकेत सर्वांच्या नजरा असणार आहेत. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेसाठी पोहोचला होता, यादरम्यान रोहित शर्मा पत्रकारांच्या एका प्रश्नावर चांगलाच संतापला.

नागपूर सामन्यापूर्वीच भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यावेळी रोहितला त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्याबद्दल विचारण्यात आले. त्यामुळे रोहित वैतागलेला दिसला. रोहित शर्माने पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्याबाबत बोलण्यास नकार दिला.

PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Abhishek Sharma Credits Suryakumar Yadav Hardik Pandya Axar Patel For his Fastest Century
IND vs ENG: “तिघांनीही मैदानावर आल्यावर मला…”, अभिषेक शर्माने भारताच्या ‘या’ तीन खेळाडूंना दिलं शतकाचं श्रेय; सामन्यादरम्यान काय घडलं?
IND vs ENG Abhishek Sharma break Rohit Sharma record Most sixes for India in a T20I
IND vs ENG : अभिषेक शर्माने मोडला हिटमॅनचा खास विक्रम! टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा पहिलाच भारतीय
rakesh roshan
“वाईट बातमी…”, गोळीबाराच्या घटनेनंतरही राकेश रोशन यांना हृतिकसाठी अंडरवर्ल्डमधून यायचे धमक्यांचे फोन; खुलासा करत म्हणाले…
Abhijeet Chavan
“मेल्या, चप्पल तरी काढ”, नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिजीत चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तीच तर…”
shahid kapoor on where would be geet aditya jab we met (1)
“घटस्फोट झाला असता”, करीना कपूर संदर्भातील ‘त्या’ व्यक्तीच्या वक्तव्यावर शाहिद कपूर म्हणाला, “तिला कोण सहन करेल…”
Ravi Bishnoi Reveals Inside Chat With Tilak Varma During Match Winning Partnership vs England
IND vs ENG: “तो सेट झाला होता आणि मी घाईघाईत…”, तिलक वर्मा-रवी बिश्नोईमध्ये अखेरच्या षटकांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?

रोहित शर्माला बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याच्या क्रिकेटमधील भविष्याबद्दल माहिती देण्यास सांगितले असल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. यादरम्यान पत्रकार परिषदेत रोहितला त्याच्या भविष्यातील योजनांबाबत विचारलं असता तो म्हणाला, “जेव्हा तीन एकदिवसीय सामने आणि चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे, तेव्हा माझ्या भविष्यातील योजनांबद्दल बोलणं कितपत योग्य आहे. माझ्या भवितव्याबद्दल अनेक वर्षांपासून वेगवेगळे रिपोर्ट्स समोर आले आहेत आणि त्या अहवालांवर स्पष्टीकरण देण्यासाठी मी इथे आलेलो नाही. माझ्यासाठी तीन सामने आणि चॅम्पियन्स ट्रॉफी खूप महत्त्वाची आहे. माझं लक्ष या सामन्यांवर आहे आणि यानंतर काय होईल ते पाहता येईल.”

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रोहितला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल सांगण्यास सांगितले आहे. त्याचवेळी रोहितला आगामी सामन्यांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. रोहित म्हणाला, “हा एक वेगळा फॉरमॅट आहे. क्रिकेटपटू म्हणून असे चढ-उतार येत असतात आणि मी माझ्या कारकिर्दीत अशा अनेक गोष्टींचा सामना केला आहे. हे माझ्यासाठी काही नवीन नाही. आम्हाला माहित आहे की प्रत्येक दिवस हा नवीन असतो, प्रत्येक मालिका ही नवीन मालिका असते. भूतकाळात काय घडलं, यावर लक्ष केंद्रित न करता मी नव्या आव्हानाची वाट पाहत आहे. मागे वळून पाहण्याचं काही कारण नाही. पुढे काय होणार आहे आणि माझ्यासाठी पुढे काय ठेवलं आहे यावर मी लक्ष केंद्रित करणं महत्वाचे आहे. ही मालिका चांगल्या पद्धतीने सुरू करण्याचा माझा प्रयत्न असेल.”

भारत वि इंग्लंड वनडे मालिकेसाठी दोन्ही भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती

Story img Loader