बंगळूरु : भारतीय संघात फलंदाजांची मजबूत फळी सज्ज आहे. अशा वेळी वेगवान गोलंदाजांची देखिल दुसरी फळी सज्ज असणे आवश्यक आहे. एखाद्या खेळाडूच्या कामगिरीवर अवलंबून राहण्याची वेळ येता कामा नये. संघात समतोल राखणे ही काळाची गरज असल्याचे मत भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले.

सोमवारीच प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी गोलंदाजांचे महत्त्व विशद केले होते. त्याची दुसरी बाजू रोहितने समोर आणली. ‘‘अलीकडच्या काळात क्रिकेट वाढले आहे. सातत्याच्या मालिकांमुळे खेळाडूंच्या दुखापतीचा प्रश्न संघांना भेडसावत आहे. अशा वेळी एखादा प्रमुख गोलंदाज जायबंदी झाला, तर संघाचा समतोल बिघडू शकतो. त्यामुळेच गोलंदाजांची दुसरी फळीदेखील सज्ज असायला हवी,’’ असे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने सांगितले.

India Probable Playing XI For IND vs NZ 1st test As Shubman Gill Might Out of Bengaluru Test Due to Neck Injury
IND vs NZ India Playing 11: टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू होणार न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, कशी असणार भारताची प्लेईंग इलेव्हन?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
PV Sindhu enters the second round of the Denmark Open Badminton Tournament sports news
सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश
Sharad Pawar Reaction on Akshay Shinde Death
Sharad Pawar : “गृहविभागाने दाखवलेला हलगर्जीपणा…”, अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
Manu Bhaker Ramp Walk Video Viral i
Manu Bhaker : मनू भाकेरच्या रॅम्प वॉकसमोर मॉडेल्सही पडतील फिक्या, लॅक्मे फॅशन वीकमधील VIDEO होतोय व्हायरल
Jammu & Kashmir Election Results 2024
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 : जम्मू-काश्मीरची सत्ता मिळवली, कलम ३७० बाबत आता कोणती भूमिका? ओमर अब्दुल्ला म्हणाले…
IND vs BAN Basit Ali Slams Bangladesh Captain Najmul Hossain Shanto
IND vs BAN : ‘शांतोने भारताबरोबर ‘तो’ माईंड गेम खेळायला नको होता’, बासित अलीने बांगलादेशच्या कर्णधारावर साधला निशाणा
PAK vs ENG Chris Woakes on Pakistan Team
PAK vs ENG : इंग्लंडच्या गोलंदाजाने विजयानंतर पाकिस्तानची उडवली खिल्ली; म्हणाला, ‘आता खेळपट्टीत बदल केले जातील…’

हेही वाचा >>>IND vs NZ India Playing 11: टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू होणार न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, कशी असणार भारताची प्लेईंग इलेव्हन?

आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना रोहित म्हणाला, ‘‘फलंदाजीसाठी जसे आता आमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तसेच गोलंदाजांच्या बाबतीत घडायला हवे. एक गोलंदाज खेळू शकला नाही, तर त्याच्या ताकदीचा दुसरा गोलंदाज असल्याची खात्री बाळगता यायला हवी.’’

रोहितची पत्रकार परिषद ही प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या वक्तव्याची दुसरी बाजू असल्याचे सातत्याने जाणवले. संघासाठी जो शंभर टक्के योगदान देऊ शकतो अशा अकरा खेळाडूंची निवड आम्ही करणार असे गंभीर यांनी सांगितले होते. रोहितने त्यांचाच मुद्दा जणू विस्ताराने मांडला. ‘‘आम्ही काही व्यक्तींवर अवलंबून राहू शकत नाही. हे योग्यही नाही. आम्हाला भविष्याचा विचार करायचा आहे. भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित हाती असेल, असे योग्य खेळाडू आम्हाला निवडायचे आहेत,’’ असे रोहित म्हणाला.