बंगळूरु : भारतीय संघात फलंदाजांची मजबूत फळी सज्ज आहे. अशा वेळी वेगवान गोलंदाजांची देखिल दुसरी फळी सज्ज असणे आवश्यक आहे. एखाद्या खेळाडूच्या कामगिरीवर अवलंबून राहण्याची वेळ येता कामा नये. संघात समतोल राखणे ही काळाची गरज असल्याचे मत भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले.

सोमवारीच प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी गोलंदाजांचे महत्त्व विशद केले होते. त्याची दुसरी बाजू रोहितने समोर आणली. ‘‘अलीकडच्या काळात क्रिकेट वाढले आहे. सातत्याच्या मालिकांमुळे खेळाडूंच्या दुखापतीचा प्रश्न संघांना भेडसावत आहे. अशा वेळी एखादा प्रमुख गोलंदाज जायबंदी झाला, तर संघाचा समतोल बिघडू शकतो. त्यामुळेच गोलंदाजांची दुसरी फळीदेखील सज्ज असायला हवी,’’ असे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने सांगितले.

Harshit Rana concussion substitue replaces shivam dube
Harshit Rana Concussion : फलंदाजाच्या जागी गोलंदाज कसा येऊ शकतो? भारताच्या विजयानंतर कनक्शन सबस्टिट्यूटवरुन पेटला वाद
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Why was Harshit Rana allowed to bowl after coming in as concussion sub for Shivam Dube ICC Rule
IND vs ENG: हर्षित राणाला शिवम दुबेच्या जागी कनक्शन सबस्टिट्यूट म्हणून गोलंदाजीची परवानगी कशी मिळाली? काय सांगतो ICC चा नियम
Hardik Pandya Shivam Dube Partnership Record with Fifty for 6th Wicket IND vs ENG 4th T20I
IND vs ENG: हार्दिकचा नो-लूक षटकार तर शिवम दुबेचं दणक्यात पुनरागमन; दुबे-पंड्याने अर्धशतकांसह भारतासाठी रचली विक्रमी भागीदारी
Ranji Trophy Cricket Tournament Mumbai vs Meghalaya match sports news
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईला विजय अनिवार्य,आजपासून मेघालयाशी गाठ; बडोदा विरुद्ध जम्मूकाश्मीर लढतीवरही लक्ष
IND vs ENG Michael Vaughan slams Suryakumar Yadav for poor outing against England in T20I series
IND vs ENG : ‘तुम्ही प्रत्येक चेंडूवर बाऊंड्री मारु शकत नाही…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचा सूर्यकुमार यादवला सल्ला
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
IND vs ENG Tilak Varma reveals why he targeted England best bowler Jofra Archer in Chepauk T20I Match
IND vs ENG : तिलक वर्माने जोफ्रा आर्चरला का केलं होतं लक्ष्य? सामन्यानंतर स्वत:च केला खुलासा; म्हणाला, ‘जेव्हा विकेट…’

हेही वाचा >>>IND vs NZ India Playing 11: टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू होणार न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, कशी असणार भारताची प्लेईंग इलेव्हन?

आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना रोहित म्हणाला, ‘‘फलंदाजीसाठी जसे आता आमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तसेच गोलंदाजांच्या बाबतीत घडायला हवे. एक गोलंदाज खेळू शकला नाही, तर त्याच्या ताकदीचा दुसरा गोलंदाज असल्याची खात्री बाळगता यायला हवी.’’

रोहितची पत्रकार परिषद ही प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या वक्तव्याची दुसरी बाजू असल्याचे सातत्याने जाणवले. संघासाठी जो शंभर टक्के योगदान देऊ शकतो अशा अकरा खेळाडूंची निवड आम्ही करणार असे गंभीर यांनी सांगितले होते. रोहितने त्यांचाच मुद्दा जणू विस्ताराने मांडला. ‘‘आम्ही काही व्यक्तींवर अवलंबून राहू शकत नाही. हे योग्यही नाही. आम्हाला भविष्याचा विचार करायचा आहे. भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित हाती असेल, असे योग्य खेळाडू आम्हाला निवडायचे आहेत,’’ असे रोहित म्हणाला.

Story img Loader