अहमदाबाद: भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना भारतीय खेळाडूंची मानसिकता माहीत आहे, असे असतानाही इंदूर कसोटीत आम्हाला अतिआत्मविश्वासामुळे पराभवाला सामोरे जावे लागले, असे त्यांना वाटत असल्यास त्यात तथ्य नाही. आम्हाला बाहेरील व्यक्तींच्या मताने फारसा फरक पडत नाही, असे प्रत्युत्तर भारताचा कर्णधार रोहित शर्माने दिले.

शास्त्री २०१४ सालापासून सहा वर्षे भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. सध्या ते बॉर्डर-गावस्कर मालिकेत समालोचन करत आहेत. भारताला इंदूर येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत मोठा पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यानंतर शास्त्री यांनी भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेवर टीका केली होती. ‘आत्मसंतुष्टता आणि अतिआत्मविश्वास भारताला महागात पडला. प्रत्येक गोष्ट तुम्ही गृहीत धरता हे योग्य नाही. ही वृत्ती कधी तरी तुम्हाला खाली आणले,’ असे शास्त्री म्हणाले होते. परंतु चौथ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधताना रोहितने माजी प्रशिक्षकांची सगळी मते खोडून काढली.

Ranveer Allahbadia
Ranveer Allahbadia : प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादिया YouTube वरून किती कमावतो? जाणून घ्या!
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Ranji Trophy Mumbai match news in marathi
रणजी क्रिकेट स्पर्धा : तळाच्या फलंदाजांमुळे मुंबई सुस्थितीत; पहिल्या दिवसअखेर ८ बाद २७८ धावा; मुलानी, कोटियनने तारले
Stop adulteration in milk otherwise action will be taken says Babasaheb Patil warns
दुधातील भेसळ थांबवा, अन्यथा कारवाई; बाबासाहेब पाटील यांचा इशारा
IND vs ENG Fans asked Rohit Sharme retire from the ODI after he dismissed for just 2 runs in Nagpur
IND vs ENG : ‘रोहित शर्माला निवृत्ती घ्यायला सांगा…’, दोन धावांवर बाद झाल्यानंतर चाहत्यांनी हिटमॅनला केले ट्रोल
Sanjay Raut Answer to Sanjay Shirsat
Shivsena : शिवसेनेचे दोन संजय, रेड्याची शिंगं, कुंभमेळा चेंगराचेंगरी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
Nine years of delay in transferring health centers causes patient suffering due to controversy
आरोग्य केंद्रे हस्तांतरण वादाचा रुग्णांना फटका, केंद्रांच्या दुरुस्तीकडेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
AnJali Damania on Dhananjay Munde
Anjali Damania : “दमानिया नव्हे बदनामिया”, धनंजय मुंडेंच्या टीकेवर अंजली दमानियांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “खरंतर मला…”

‘‘चार सामन्यांच्या मालिकेत जेव्हा तुम्ही दोन सामने जिंकून आघाडी घेता आणि तिसऱ्या कसोटीत तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागते, तेव्हा आम्हाला अतिआत्मविश्वास महागात पडला असे बाहेरून पाहणाऱ्याला व्यक्तीला वाटत असेल, तर त्याला काहीच अर्थ नाही. खेळाडू आणि संघ म्हणून तुम्हाला चारही कसोटी सामन्यांत सर्वोत्तम कामगिरी करायची असते. दोन सामने जिंकून समाधान मानायचे नसते. ‘ड्रेसिंग रुम’मध्ये नसलेल्या व्यक्तीला आम्ही कशाबाबत चर्चा केली आहे, हे ठाऊक नसते. त्यामुळे आमच्या कामगिरीबद्दल बाहेरील लोकांना काय वाटते याने आम्हाला फारसा फरक पडत नाही,’’ असे रोहित म्हणाला.

‘‘रवी हे काही काळापूर्वीच आमच्या संघाचा भाग होते. त्यांना आमची मानसिकता ठाऊक आहे. त्यांनी आमच्याबाबतीत अतिआत्मविश्वास हा शब्द वापरणे योग्य नाही. परदेशात खेळताना प्रतिस्पर्धी संघ आम्हाला कधीही सामन्यात आणि मालिकेत परतण्याची संधी मिळणार नाही असे डावपेच आखतात. आम्हीही अशीच मानसिकता राखून आहोत,’’ असेही रोहितने स्पष्ट केले.

Story img Loader