IND vs NZ Rohit Sharma Statement on Virat Kohli: न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय क्रिकेट संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. पावसामुळे पहिल्या दिवशी नाणेफेकही नाही झाली आणि सामन्याचा खेळ रद्द झाला. अशा स्थितीत दुसऱ्या दिवसापासून सामना सुरू झाला ज्यामध्ये भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी नोंदवली आणि संपूर्ण संघ ४६ धावांवर गडगडला. भारतीय संघाचे ५ फलंदाज खाते न उघडताच बाद झाले. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याची कल्पना कोणाची होती, त्यावर रोहित शर्माने उत्तर दिलं आहे.

बंगळुरू कसोटीत टीम इंडिया फक्त दोन वेगवान गोलंदाजांसह खेळत आहे. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांच्या त्रिकुटाने भारताला फलंदाजी करताना जास्त वेळ मैदानावर टिकू दिले नाही. मॅट हेन्रीच्या ५ विकेट आणि विल्यम ओरूकच्या ४ विकेट्सपुढे संपूर्ण भारतीय संघाने शरणागती पत्करली. याच सामन्यात विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले आणि तोही फ्लॉप ठरला. पत्रकार परिषदेत रोहितने विराट तिसऱ्या क्रमांकावर का आला आणि केएल राहुलला का पाठवले नाही हे सांगितले.

IND vs BAN Sanju Samson highest strike rate by wicket keeper in a t20i century
Sanju Samson : संजूने इशानला मागे टाकत मोडला डी कॉकचा विक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
IND vs BAN 3rd T20I Sanju Samson credited captain Suryakumar Yadav and coach Gautam Gambhir
IND vs BAN : ‘मी खूप वेळा अपयशी ठरलो आहे पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनच्या प्रतिक्रियेने टीम इंडियासह चाहत्यांची जिंकली मनं
IND vs BAN 1st T20 Match Hardik Pandya broke Virat Kohlis record for most match winning sixes in T20I
Hardik Pandya : हार्दिकने मोडला विराटचा खास विक्रम! भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
India vs Bangladesh 1st T20 Match highlights
IND vs BAN : सूर्याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने फडकावली विजयी पताका, बांगलादेशचा ७ विकेट्सनी उडवला धुव्वा
India Becomes First Team in 21st Century to Declared the First Innings under 35 overs in IND vs BAN Kanpur Test
IND vs BAN: टीम इंडियाने कानपूर कसोटीत लिहिला नवा इतिहास, २१व्या शतकात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ
IND vs BAN 2nd Test Match Updates in Marathi
IND vs BAN : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत केला नवा विश्वविक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ
SL vs NZ 2nd Test match Kane Williamson surpasses Virat Kohli's record in Test
SL vs NZ : केन विल्यमसनने विराट कोहलीला मागे टाकत केला खास पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला १९वा खेळाडू

हेही वाचा – Rohit Sharma: “माझ्यामुळे संघाची ही स्थिती…”, रोहित शर्माचे भारत ४६ वर ऑल आऊट झाल्यानंतर मोठे वक्तव्य, नाणेफेकीच्या निर्णयाबद्दल पाहा काय म्हणाला?

विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याची कल्पना कोणाची होती? रोहितने दिलं उत्तर

विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक वेळेस चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. शुबमन गिल संघाबाहेर झाल्यानंतर केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो, असे बोलले जात होते. पण तसे झाले नाही आणि त्याच्या जागी विराट कोहली फलंदाजीला आला. रोहित आऊट झाल्यानंतर कोहली क्रीजवर आला आणि तोही खाते न उघडताच बाद झाला.

रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला की, आम्हाला केएल राहुलच्या फलंदाजीच्या स्थितीत छेडछाड करायची नव्हती. त्याला सहाव्या क्रमांकावर आपले स्थान मिळाले आहे. अशा परिस्थितीत, आम्ही त्यांना त्याच नंबरवर आहार देऊ इच्छितो. सर्फराझच्या बाबतीतही तेच आहे. आम्हाला त्याला त्याच फलंदाजीची स्थिती द्यायची आहे. विराट कोहलीला ही जबाबदारी घ्यायची होती.

हेही वाचा – IND vs NZ: भारताच्या वाताहतीला ‘हे दोन’ निर्णय कारणीभूत, रोहित शर्माच्या निर्णयाचा बसला मोठा फटका, तर विराट…

रोहित शर्मा विराट कोहलीच्या फलंदाजी क्रमाबद्दल बोलताना म्हणाला की, “हो केएल राहुल इथलाच आहे, म्हणजे त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे का? बऱ्याच काळानंतर केएल राहुलला सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे आणि त्याने त्याच क्रमांकावर फलंदाजी करावी, अशी आमची इच्छा आहे. विराट कोहलीला ही जबाबदारी घ्यायची होती.”

“सर्फराझ खानला विचारलं होतं की तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो का? सर्फराझ खानने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी असाही विचार आम्ही करत होतो, तो चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर सहसा फलंदाजी करत होतो. आम्हाला ऋषभ पंत आणि केएल राहुलचा क्रमांक बदलायचा नव्हता. त्यामुळे सर्फराझ खान चौथ्या आणि विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला गेला. जर एखादा खेळाडू स्वत: पुढे येऊन जबाबदारी घेत असेल तर ते चांगले लक्षण आहे.”