Rohit Sharma Statement on T20 WC Final Last 5 Overs: कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला आणि आयसीसी ट्रॉफी आपल्या नावे केले आहे. दक्षिण आफ्रिकेला अखेरच्या ५ षटकांमध्ये म्हणजेच ३० चेंडूत ३० धावांची गरज होती. इथून भारतीय संघाने डाव पलटला आणि दिमाखदार विजय मिळवला. या विजयासह रोहित शर्माच्या नेतृत्त्वाचेही कौतुक केले जात होते. पण अखेरच्या ५ षटकांमध्ये सामना जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने होता तेव्हा रोहित शर्माच्या मनात नेमकं काय चालू होतं, याबद्दल रोहित शर्माने सांगितलं आहे.

हेही वाचा – IND vs ZIM: एका चेंडूत १३ धावा! यशस्वी जैस्वालचा दुर्मिळ विक्रम, T20I च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज

Abhishek Sharma Highest T20I Score for India 135 Runs Breaks Many Records IND vs ENG 5th T20I
IND vs ENG: अभिषेक शर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये कोणत्याच भारतीय फलंदाजाला जमलं नाही ते करून दाखवलं
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Rohit Sharma Viral Video of BCCI Awards on Smriti mandhana Question
VIDEO: “माझी बायको बघत असेल…”, विसरभोळ्या रोहित शर्माचं स्मृती मानधनाच्या प्रश्नावर भलतंच उत्तर; नेमकं काय घडलं?
IND vs ENG Gautam Gambhir played a master stroke as Harshit Rana to beat England Pune T20I match
IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे भारताने मारली बाजी! ‘हा’ निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
Viral Video
नवरदेव स्वत:च्याच लग्नात बनला भटजी, वैदिक मंत्रपठण सुरू करताच नवरीसह सगळेच थक्क; Video Viral
Rohit Sharma complains to BCCI about Sunil Gavaskar after blames his criticism BGT in Australia
Rohit Sharma : रोहित शर्माने बीसीसीआयकडे केली सुनील गावस्करांची तक्रार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या
Abhijeet Chavan
“मेल्या, चप्पल तरी काढ”, नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिजीत चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तीच तर…”
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा

दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या ३० चेंडूत सहा विकेट्स शिल्लक असताना विजयासाठी फक्त ३० धावा हव्या होत्या आणि भारतीय संघ बॅकफूटवर गेला होता. त्याबरोबरच हेनरिक क्लासेनची वादळी फलंदाजी सुरू होती. भारतीय फिरकीपटूंची त्याने धुलाई करत २३ चेंडूत अर्धशतक करत मैदानात उभा होता. रोहित शर्मा या ५ षटकांबाबत सांगताना म्हणाला की तो ५ षटके शिल्लक असताना तो पूर्णपणे ब्लँक होता. भारताचा कर्णधार पुढे म्हणाला की त्याक्षणी शांत राहून संपूर्ण संघाने रणनीती पार पाडण्यासाठी शांत राहणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा – VIDEO: “कर्णधारपद आणि प्रसिद्धी मिळताच विराट बदलला, पण रोहित…” अनुभवी फिरकीपटू नेमकं काय म्हणाला?

फायनलमधील अखेरच्या षटकांत Rohit Sharma आणि संघाने कसा फिरवला सामना?

“त्यावेळेला मला काहीच सुचत नव्हतं. मी फार पुढचा विचार करत नव्हतो. माझ्यासाठी त्या क्षणी शांत राहून सामन्यावर लक्ष केंद्रित करणं खूप महत्वाचं होतं. आम्हा सर्वांसाठी शांत राहत आम्ही जी रणनीती आखली होती ती यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणे खूप महत्वाचे होते,” असे रोहित डलास येथे एका कार्यक्रमात म्हणाला.

“दक्षिण आफ्रिकेला ३० चेंडूत ३० धावांची गरज असताना आम्ही प्रचंड दबावाखाली होतो, तेव्हा आम्ही गोलंदाजांनी केलेल्या पाच षटकांनी हे दाखवून दिले की आम्ही किती शांतपणे ती परिस्थिती हाताळत होतो. इतर कशाचाही विचार न करता आम्ही फक्त आमच्या कामावर लक्ष केंद्रित केले. आम्ही घाबरलो नाही जे आमच्यासाठी खूप चांगले होतं,” असं रोहित तो पुढे म्हणाला.

हेही वाचा – हरभजन-युवराज-रैनाविरूद्ध पोलीस तक्रार दाखल, भज्जीने ‘तो’ व्हीडिओ डीलीट करत मागितली माफी; पाहा नेमकं काय झालं?

शेवटच्या पाच षटकांमध्ये भारताला अवघ्या २९ धावांचा करायचा होता. भारताचा सर्वाेत्कृ्ष्ट गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा संघाच्या बचावासाठी आला आणि त्याला इतर दोन वेगवान गोलंदाज हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांनी चांगली साथ दिली. बुमराहने त्याच्या स्पेलमधील शेवटच्या षटकात अवघ्या सहा धावा दिल्या आणि त्याला मार्को यान्सेनला क्लीन बोल्ड करत मोठी विकेट मिळवून दिली.

अर्शदीप सिंगनेही १९व्या षटकात केवळ चार धावा देत दबाव कायम ठेवला. हार्दिक पांड्याला १७व्या षटकात क्लासेनची सर्व-महत्त्वाची विकेट मिळाली. या अष्टपैलू खेळाडूने महत्त्वपूर्ण शेवटचे षटक टाकले आणि पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवच्या चित्तथरारक झेलसह डेव्हिड मिलरला बाद केले. सूर्यकुमार यादवच्या कॅचनंतर भारतीय संघाने विजयावर शिक्कामोर्तब केले.

Story img Loader