Rohit Sharma on Why He Choose Batting After Winning Toss: भारत वि न्यूझीलंड बंगळुरू कसोटीत भारतीय संघाने घरच्या मैदानावर कसोटीत सर्वात कमी धावसंख्या नोंदवली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ ४६ धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या या कामगिरीला कारणीभूत ठरणारा एक निर्णय म्हणजे नाणेफेक. भारतीय संघाने या कसोटीची नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी पावसामुळे मैदान आणि पिच कव्हर केले होते. त्यामुळे मैदानावर वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल असे चित्र होते, तरीही रोहितने नाणेफेकीनंतर फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताने लाजिरवाणा रेकॉर्ड आपल्या नावे केला. यावर रोहित शर्माने सामन्यानंतर वक्तव्य केले आहे.

बंगळुरू कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ झाल्यानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला, “खेळपट्टीवर फार गवत नव्हते, अशा सपाट खेळपट्टीवर कुलदीप विकेट घेतो आणि त्यामुळे प्लेईंग इलेव्हनमध्ये कुलदीपला संधी देण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी थोडी सपाट असेल असे आम्हाला सुरूवातीला वाटले होते. सोप्या भाषेत सांगू तर खेळपट्टीबाबत माझा अंदाज चुकला. मी खेळपट्टी नीट समजून घेऊ शकलो नाही आणि त्यामुळेच संघाची आता ही स्थिती आहे.”

Hardik Pandya No look shot video viral during India vs Bangladesh 1st T20 Match
Hardik Pandya : हार्दिक पंड्याच्या No Look शॉटने चाहत्यांना लावलं वेड, VIDEO होतोय तुफान व्हायरल
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
IND W vs PAK W match Harmanpreet Kaur Injury Video viral
Harmanpreet Kaur : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या मानेला गंभीर दुखापत, VIDEO व्हायरल
Sanjay Manjrekar comment created Controversy face the taunt of Mumbai lobby
‘उत्तरेकडील खेळाडूंकडे मी फारसे लक्ष…’, संजय मांजरेकर वादग्रस्त वक्तव्यामुळे ट्रोल; चाहते म्हणाले, ‘मुंबई लॉबी…’
India vs Bangladesh 1st T20I Match Updates in Marathi
IND vs BAN 1st T20 सामन्यापूर्वी ग्वाल्हेरमध्ये वाढवली सुरक्षा, नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या
IND vs BAN Rohit Sharma Take Bold Decision After Winning Toss to Bowl First in India After 9 Years Kanpur Test
IND vs BAN: रोहित शर्माचा दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकत चकित करणारा निर्णय, ९ वर्षांत पहिल्यांदाच घडली अशी घटना
India vs Bangladesh 2nd Test from today sport news
वर्चस्व राखण्याचे भारताचे लक्ष्य! बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी आजपासून; सलग १८व्या मालिका विजयासाठी प्रयत्नशील
Test cricket match against Bangladesh India hold on to the match
भारताची सामन्यावर पकड; पंत, गिलच्या शतकानंतर अश्विनची फिरकी प्रभावी; बांगलादेश ४ बाद १५८

हेही वाचा – IND vs NZ: भारताच्या वाताहतीला ‘हे दोन’ निर्णय कारणीभूत, रोहित शर्माच्या निर्णयाचा बसला मोठा फटका, तर विराट…

नाणेफेक जिंकून रोहितने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला, असे त्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात होते. यावर रोहितने स्पष्ट शब्दात सांगितले की, “एक कर्णधार म्हणून संपूर्ण संघ ४६ धावांवर बाद होताना पाहणे वेदनादायक आहे. वर्षभरात एक-दोन चुकीचे निर्णय घेतले जातात, ठीक आहे.”

भारतीय संघ ४६ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर रोहित शर्मा स्वत: पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता, यात त्याने स्वत:ची चूक मान्य करत बऱ्याच मुद्द्यांवर भाष्य केले. रोहित शर्मा स्वत: पत्रकार परिषदेला येऊन त्याने अनेक प्रश्नांची धाडसाने उत्तर दिलं. यामुळे चाहते त्याचं कौतुकही करत आहेत.

हेही वाचा – IND VS NZ: ऋषभ पंत दुखापतीमुळे मैदानाबाहेर, अपघातात दुखापत झालेल्या गुडघ्याला लागला चेंडू, टीम इंडिया टेन्शनमध्ये

भारतीय संघ ४६ वर सर्वबाद झाल्यानंतर न्यूझीलंडने प्रत्युत्तरात चांगली फलंदाजी केली. खराब प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ बाद १८० धावा केल्या आहेत. यासह न्यूझीलंडने १३४ धावांची आघाडी मिळवली आहे. भारताकडून कुलदीप यादवने संघाला पहिली विकेट मिळवून दिली. यानंतर घातक ठरत असलेल्या डेव्हॉन कॉन्वेला अश्विनने क्लीन बोल्ड केले. तर जडेजाने विल यंगला बाद करत अजून एक विकेट मिळवून दिली.