Rohit Sharma Statement on India Defeat: न्यूझीलंडविरूद्ध बेंगळुरूमध्ये झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाने पुणे कसोटीही गमावली. यासह न्यूझीलंडने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर २-० ने कब्जा केला. न्यूझीलंडने भारतात मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुणे कसोटी सामन्यात टीम इंडियाला खराब कामगिरीचा फटका बसला, त्यामुळे भारताला ११३ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर रोहित शर्मा नाराज दिसला आणि त्याने मोठं वक्तव्यही केलं आहे. रोहितनेही सामन्यानंतर केलेल्या वक्तव्यात पराभवाची अनेक कारणे सांगितली.

हेही वाचा – WTC Points Table: न्यूझीलंडकडून दारूण पराभवानंतर भारताची बिकट अवस्था, WTC गुणतालिकेतील पहिले स्थान धोक्यात, भारत फायनलला मुकणार?

IND vs NZ India 12-year test series defeat in home ground
IND vs NZ : २४ वर्षांत टीम इंडियावर तिसऱ्यांदा ओढवली नामुष्की; मायदेशात गमावले सलग दोन कसोटी सामने
Daily Horoscope 25th October in Marathi
Today’s Horoscope, 25 October : पंचांगानुसार आजचा शुभ…
uddhav thackeray
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मित्रपक्षाने युती तोडली, विधानसभेला स्वबळाचा नारा
IND vs PAK Abhishek Sharma and Pakistani Bowler Fights Indian Batter Gives Death Stare After Fiery Send Off Watch Video
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात राडा, पाकिस्तानी गोलंदाजाने डिवचलं, अभिषेक शर्माकडून चोख प्रत्युत्तर, पाहा VIDEO
WTC Points Table Changed After IND vs NZ Bengaluru Test as India PCT Drop For World Test Championship Qualification Scenario
WTC Points Table मध्ये भारतीय संघाला बसला मोठा धक्का, विजयानंतर न्यूझीलंड संघाने घेतली झेप, टीम इंडिया चिंतेत
Sachin Tendulkar Statement on Sarfaraz Khan Maiden Test Century IND vs NZ Bengaluru Test
IND vs NZ: “जेव्हा भारताला सर्वात जास्त…,” सचिन तेंडुलकरची सर्फराझ खानसाठी खास पोस्ट, पहिल्या शतकाबद्दल पाहा काय म्हणाला?
Israel-Hezbollah War:
Israel-Hezbollah War: खजिना सापडला! हसन नसरल्लाहच्या बंकरमध्ये सापडले ५०० दशलक्ष डॉलर्सचे सोने आणि रोख रक्कम; इस्रायलचा मोठा दावा
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारताच्या मोठ्या मालिका पराभवानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?

रोहित शर्माने भारताच्या पराभवानंतर बोलताना सुरूवातच निराशाजनक या शब्दाने केली आहे. हा पराभव निराशाजनक असल्याचे सांगत रोहित शर्मा म्हणाला, “आम्ही अशा पराभवाची अपेक्षा केली नव्हती. याचे श्रेय न्यूझीलंडला जाते, ते आमच्यापेक्षा खूप चांगले खेळले. आम्ही संधीचा फायदा घेण्यात कुठेतरी अपयशी ठरलो. आम्ही त्या आव्हानांवर मात करण्यात अयशस्वी झालो, म्हणूनच आज आम्ही या वळणावर उभे आहोत. माझ्या मते, आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. जिंकण्यासाठी तुम्हाला २० विकेट्स घ्याव्या लागतात. होय, पण त्यासाठी फलंदाजांना फलकावर धावसंख्याही उभारावी लागते.”

हेही वाचा – Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालने कसोटीत घडवला नवा इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला एकमेव भारतीय फलंदाज

रोहित शर्मा पुढे म्हणाला, “त्यांना (न्यूझीलंड) तिसऱ्या दिवशी २५० धावांवर रोखत आम्ही चांगले पुनरागमन केले होते, परंतु आम्हाला माहित होते की ते आव्हान असणार मोठे आहे. जेव्हा त्यांनी डावाला सुरूवात केली तेव्हा त्यांची धावसंख्या ३ बाद २०० होती आणि त्यांना २५९ धावांवर बाद करत आम्ही चांगले पुनरागमन केले. खेळपट्टीकडून फारशी मदत मिळत नव्हती. इतकंच की आम्ही फक्त चांगली फलंदाजी केली नाही. जर आम्ही पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली असती आणि अपेक्षित धावसंख्येच्या जवळ पोहोचलो असतो तर कदाचित आता परिस्थिती वेगळी असती.”

हेही वाचा – IND vs NZ: रोहित-विराट अपयशी, आततायी फटकेबाजी… पुण्यात न्यूझीलंडने भारताचा विजयरथ कसा रोखला? पराभवाची ५ कारणं

रोहित शर्माने पुढे म्हटले की, “आम्हाला वानखेडेवर चांगली कामगिरी करून ती कसोटी जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे संपूर्ण संघाचे अपयश आहे. मी फक्त फलंदाज किंवा गोलंदाजांना दोष देणार नाही. आम्ही चांगल्या योजनांसह आणि चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने वानखेडेमध्ये खेळण्यासाठी उतरू.”