Rohit Sharma on T20I Retirement: भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशविरूद्ध कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी कर्णधार रोहित शर्माकडे आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया यावेळी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज आहे. याआधी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले होते. या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माने क्रिकेटच्या टी-२० फॉरमॅटला अलविदा केला.

जिओसिनेमाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान रोहित शर्माला विचारण्यात आले की, ‘आयसीसी ट्रॉफी जिंकल्यानंतर तू निवृत्त होशील याची चाहत्यांना भीती वाटते. यावेळीही असं काही होईल का?’, रोहितने त्याच्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिले.

Ajit pawar on union budget 2025
Budget 2025: अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं? अर्थमंत्री अजित पवार म्हणाले…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Chhagan Bhujbal
“तेलगी प्रकरणात माझं…”, दोन दशकानंतर भुजबळांनी मनातली खदखद व्यक्त केली; मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल म्हणाले…
IND vs ENG Michael Vaughan slams Suryakumar Yadav for poor outing against England in T20I series
IND vs ENG : ‘तुम्ही प्रत्येक चेंडूवर बाऊंड्री मारु शकत नाही…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचा सूर्यकुमार यादवला सल्ला
"Ex-IMF Executive Director discussing tax policy reforms in India"
Budget 2025 : “…त्याचा फायदा तुम्हा आम्हाला नाही तर…”, आयएमएफच्या माजी अधिकाऱ्याची भारतीय Tax System वर टीका
Rohit Sharma complains to BCCI about Sunil Gavaskar after blames his criticism BGT in Australia
Rohit Sharma : रोहित शर्माने बीसीसीआयकडे केली सुनील गावस्करांची तक्रार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या
Abhijeet Chavan
“मेल्या, चप्पल तरी काढ”, नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिजीत चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तीच तर…”
Gautam Gambhir Manoj Tiwary Controversy : Gautam says Sourav Ganguly apna jack laga ke aaya Manoj Tiwary has revealed
Manoj Tiwary : ‘तो जॅक लावून आला आणि तू पण…’, गंभीरने गांगुलीबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य; मनोज तिवारीचा खुलासा

हेही वाचा – Rohit Sharma: “मजा घेऊ द्या त्यांनाही…”, रोहित शर्माने इंग्लंडचं उदाहरण देत बांगलादेशला दिला इशारा

रोहित म्हणाला, ‘आजच्या काळात लोकांनी निवृत्तीची चेष्टा मांडली आहे. खेळाडू निवृत्ती घेतात आणि पुन्हा खेळू लागतात. भारतात असं अजून झालेलं नाही. निवृत्तीनंतर खेळाडू परत येऊन खेळतात, असं इथे क्वचितच पाहायला मिळालं आहे. पण मी इतर देशांच्या खेळाडूंना पाहतो. हे खेळाडू निवृत्तीची घोषणा करतात. पण नंतर खेळायला परत मैदानात उतरतात. त्यामुळे तो खेळाडू निवृत्त झाला आहे की नाही हे तुम्हाला समजत नाही.”

रोहित स्वत:बद्दल म्हणाला, ‘माझं तसं नाहीय. टी-२० मधून निवृत्ती घेण्याचा माझा अंतिम निर्णय आहे. टी-२० क्रिकेटला अलविदा करण्याची तीच योग्य वेळ होती म्हणून मी तसं केलं. मी भारतासाठी या फॉरमॅटमध्ये खेळायला सुरुवात केली. मी माझा पहिला सामना एकदिवसीय सामन्यामध्ये खेळलो, पण नंतर थेट टी-२० विश्वचषक खेळायला गेलो. तेव्हा आम्ही तो विश्वचषक पटकावला होता. आता मी आणखी एक टी-२० वर्ल्डकप जिंकला आहे.”

हेही वाचा – IND vs BAN Live Streaming: ना सोनी, ना स्टार, या चॅनेलवर पाहता येईल भारत-बांगलादेश मालिकेचं थेट प्रक्षेपण

हेही वाचा –IND vs BAN 1st Test : बांगलादेशचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्माची टी-२० कारकीर्द

रोहित शर्माने जवळपास १७ वर्षे टीम इंडियासाठी टी-२० क्रिकेट सामने खेळले आहेत. या काळात तो दोनदा टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. त्याने २००७ मध्ये संघातील खेळाडू म्हणून पहिली ट्रॉफी आणि २०२४ च्या विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून दुसरी ट्रॉफी जिंकली आहे. रोहित शर्माने टीम इंडियासाठी एकूण १५९ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ५ शतकांच्या मदतीने ४२३१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने ३२ अर्धशतकेही केली आहेत.

Story img Loader