Rohit Sharma, Virat Kohli, Jasprit Bumrah Rested for India vs Sri Lanka Series: भारताचा युवा क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळत आहे. यानंतर टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यासाठी भारतीय संघ श्रीलंकेला रवाना होणार आहे. जुलैच्या अखेरीस श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका होणार आहे. तर एकदिवसीय मालिका २ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पण या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचे वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह खेळताना दिसणार नाहीत.

हेही वाचा – कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…

Will AAP win Delhi Assembly elections 2025 for fourth time or BJP will get chance after 31 years
‘आप’ चौथ्यांदा, की… भाजपला ३१ वर्षांनी संधी?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
archana patil chakurkar marathi news
अर्चना चाकुरकरांच्या प्रश्नामुळे भाजपमधील जुन्या – नव्याचा वाद पुन्हा चव्हाट्यावर
India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
Champions Trophy opening ceremony to be held in Lahore sports news
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे उद्घाटन तीन दिवस आधीच? सोहळा लाहोरला घेण्याची योजना
Virat Kohli returns to Ranji Trophy cricket sport news
कोहलीला सूर गवसणार? रणजी करंडकात आज १२ वर्षांनी
IND vs ENG Michael Vaughan slams Suryakumar Yadav for poor outing against England in T20I series
IND vs ENG : ‘तुम्ही प्रत्येक चेंडूवर बाऊंड्री मारु शकत नाही…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचा सूर्यकुमार यादवला सल्ला
We always learn from a T20I Game Says Suryakumar Yadav after defeat against England in 3rd T20I
IND vs ENG : ‘…म्हणून पराभव पदरी पडला’, सूर्यकुमार यादवने सांगितला राजकोट सामन्यातील टर्निंग पॉइंट

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार आणि इतर दोन वरिष्ठ खेळाडूंनी अधिक विश्रांती घ्यावी अशी भारतीय क्रिकेट बोर्डाची इच्छा आहे. रोहित, विराट आणि बुमराह हे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेतून संघात पुनरागमन करतील. सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरूद्ध भारताला दोन कसोटी आणि तीन टी-२० सामने भारतात खेळायचे आहेत.

२७ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नुकत्याच झालेल्या विश्वचषकानंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तर बुमराहने सांगितले की तो देशासाठी यापुढेही खेळताना दिसणार आहे. पुढील आठवड्यात संघ निवडीसाठी निवड समितीची बैठक होणार आहे.

हेही वाचा – VIDEO: विराट कोहलीचा अलिबागमधील आलिशान बंगला पाहिलात का? कोट्यवधींच्या वास्तूत आहेत या गोष्टी

“वरिष्ठ खेळाडू थोडी विश्रांती घेऊ शकतात आणि पुढील संपूर्ण क्रिकेट हंगामासाठी सज्ज होतील. रोहित, विराट आणि बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे आणि ते सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी संघात सामील होतील,” असे बीसीसीआयच्या एका सूत्राने इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

बांगलादेशनंतर, भारतीय संघ १६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान न्यूझीलंडविरूद्ध तीन कसोटी सामन्यांसाठी खेळणार आहे. या सामन्यांसाठी न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर ८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध चार टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी रवाना होईल. त्यानंतर २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.

Story img Loader