Rohit Sharma, Virat Kohli, Jasprit Bumrah Rested for India vs Sri Lanka Series: भारताचा युवा क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळत आहे. यानंतर टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यासाठी भारतीय संघ श्रीलंकेला रवाना होणार आहे. जुलैच्या अखेरीस श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका होणार आहे. तर एकदिवसीय मालिका २ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पण या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचे वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह खेळताना दिसणार नाहीत.

हेही वाचा – कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…

PAK vs BAN Test Series Yasir Arafat on PCB
PAK vs BAN : पीसीबी म्हणजे एक सर्कस, त्यात अनेक जोकर भरलेत; माजी खेळाडूची कठोर शब्दात टीका
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Bangladesh historic victory over Pakistan, cricket,
विश्लेषण : बांगलादेशने कसा साकारला पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय? भारताला धक्का देण्याची शक्यता किती?
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
Basit Ali Gives Suggestion to PCB Said Just Copy What India Is Doing
PAK vs BAN: “भारतीय संघाला कॉपी करा…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा PCB ला सल्ला; म्हणाला, “पाकिस्तान क्रिकेट यशस्वी होण्यासाठी भारत…”
Murder case filed against Shakib Al Hasan
Shakib Al Hasan : धक्कादायक! बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनविरोधात खुनाचा गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
ICC Test Ranking Updates Indian Players Ravindra Jadeja and R Ashwin Table Topper
ICC Test Rankings: ICC ने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारताच्या खेळाडूंचा दबदबा, अश्विन-जडेजा पहिल्या स्थानी तर रोहित-विराट…
former pakistan cricketer basit ali advises jasprit bumrah to focus on bowling instead of captaincy
कर्णधारपदामागे धावू नकोस! पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीचा बुमराला सल्ला

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार आणि इतर दोन वरिष्ठ खेळाडूंनी अधिक विश्रांती घ्यावी अशी भारतीय क्रिकेट बोर्डाची इच्छा आहे. रोहित, विराट आणि बुमराह हे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेतून संघात पुनरागमन करतील. सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरूद्ध भारताला दोन कसोटी आणि तीन टी-२० सामने भारतात खेळायचे आहेत.

२७ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नुकत्याच झालेल्या विश्वचषकानंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तर बुमराहने सांगितले की तो देशासाठी यापुढेही खेळताना दिसणार आहे. पुढील आठवड्यात संघ निवडीसाठी निवड समितीची बैठक होणार आहे.

हेही वाचा – VIDEO: विराट कोहलीचा अलिबागमधील आलिशान बंगला पाहिलात का? कोट्यवधींच्या वास्तूत आहेत या गोष्टी

“वरिष्ठ खेळाडू थोडी विश्रांती घेऊ शकतात आणि पुढील संपूर्ण क्रिकेट हंगामासाठी सज्ज होतील. रोहित, विराट आणि बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे आणि ते सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी संघात सामील होतील,” असे बीसीसीआयच्या एका सूत्राने इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

बांगलादेशनंतर, भारतीय संघ १६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान न्यूझीलंडविरूद्ध तीन कसोटी सामन्यांसाठी खेळणार आहे. या सामन्यांसाठी न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर ८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध चार टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी रवाना होईल. त्यानंतर २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.