Salman Butt: आशिया कप २०२३ला आता फक्त एक आठवडा बाकी आहे. हायब्रीड मॉडेलमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात पाकिस्तानी भूमीवर खेळवला जाणार आहे. तर भारतीय संघ श्रीलंकेतील कॅंडी येथे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याने मालिकेला सुरुवात करेन. त्यानंतर ऑक्‍टोबरमध्ये २०२३चा वर्ल्डकप भारतात होणार आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या टुर्नामेंटपूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट्टने दोन्ही संघांबाबत आश्चर्यचकित करणारे वक्तव्य केले आहे.

सलमान बट्टने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, “सध्या प्रयोग करण्याची ही वेळ नाही. यापैकी कोणताही संघ २०००च्या दशकातील ऑस्ट्रेलियासारखा नाही, जो एका रात्रीत काहीही करू शकला आणि तरीही जिंकला. तुम्ही नवीन खेळाडू उतरवणार आणि सामने जिंकणार किंवा तुम्ही जुने विजेते खेळाडू खेळवणार आणि तरीही जिंकणार. दोन्ही परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान हे संघ त्या संघासारखे नाहीत आणि त्यांना ते माहित आहे. तरीही हा प्रयोग करण्याचा अट्टहास का?” असा संतप्त सवाल त्याने केला.

Pakistan Pacer Shocking Revelation Said Naseem Shah is far Better Than Jasprit Bumrah in Podcast Watch Video
Jasprit Bumrah: “जसप्रीत बुमराहपेक्षा नसीम शाह चांगला गोलंदाज…”, पाकिस्तानच्या खेळाडूचं मोठं विधान; चाहत्यांनी घेतली चांगलीच फिरकी
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
IND vs PAK Abhishek Sharma and Pakistani Bowler Fights Indian Batter Gives Death Stare After Fiery Send Off Watch Video
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात राडा, पाकिस्तानी गोलंदाजाने डिवचलं, अभिषेक शर्माकडून चोख प्रत्युत्तर, पाहा VIDEO
Pakistan A Cricket Team Captain Mohammed Haris Sensational Revelation Said Banned From Talking About India Emerging Asia Cup IND vs PAK
IND vs PAK: “भारताबद्दल बोलण्यावर बंदी…”, पाकिस्तानच्या कर्णधाराचे खळबळजनक वक्तव्य, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी पाहा नेमकं काय म्हणाला?
PAK vs ENG Ben Stokes on Babar Azam
PAK vs ENG : ‘तो पाकिस्तान क्रिकेटचा…’, बाबर-शाहीन आणि नसीम यांना संघातून डच्चू देण्यावर बेन स्टोक्स काय म्हणाला? पाहा VIDEO
Pakistan Cricket Selection Committee Change after defeat against England
PAK vs ENG : इंग्लंडविरुद्धचा लाजिरवाणा पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी, पीसीबीने ‘या’ बाबतीत केला मोठा बदल
Zakir Naik in Pakistan
Zakir Naik : झाकीर नाईकसाठी पाकिस्तानच्या पायघड्या; भेटीसाठी मोठमोठ्या नेत्यांची रांग, पहिलं वक्तव्य भारतातील वक्फ विधेयक व गोमांसावर, म्हणाला..
Babar Azam Resigns as Pakistan White ball team Captain by Social Media Post PCB
Babar Azam: “आता वेळ आली आहे की…,” बाबर आझमने मध्यरात्री अचानक कर्णधारपदाचा दिला राजीनामा, वर्षभरात दुसऱ्यांदा सोडली कॅप्टन्सी

बट्ट पुढे म्हणाला, “ते (भारत आणि पाकिस्तान) अशा संघांशी स्पर्धा करत आहेत जे त्यांच्या सामन्याच्या दिवशी धोक्याचे ठरू शकतात. ऑस्ट्रेलिया या सगळ्यात खूप पुढे निघून गेला आहे. जरी त्यांनी लवकर पाच विकेट्स गमावल्या तरीही ते एका डावात २७५-३०० धावा करू शकतात. ऑस्ट्रेलिया हे ड्रीम युनिट होते आणि अजूनही आहे. भारत आणि पाकिस्तान हे विश्वचषकासाठी ड्रीम युनिट नाहीत आणि त्यांना ते माहित असूनही त्यावर काम करत नाहीत, हे खूप मोठं दुर्दैव आहे.”

हेही वाचा: AFC League: नेयमार पहिल्यांदाच भारतीय भूमीवर खेळणार, पुण्याच्या AFC चॅम्पियन्स लीगमध्ये दिसणार स्टार फुटबॉलपटूचा जलवा!

धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चमकदार होती

पाकिस्तानचा माजी कर्णधार पुढे म्हणाला की, “एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताची फलंदाजी उत्कृष्ट होती. सध्या, त्यांना एक फ्लो व्यवस्थित ठेवावा लागेल, जर रोहित किंवा कोहलीने मोठी धावसंख्या केली नाही तर भारताच्या गोलंदाजांसमोर खूप अडचणी निर्माण होतील. तशीच परिस्थिती पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर येऊ शकते.”

स्पर्धेतील पहिला सामना मुलतानमध्ये खेळवला जाणार आहे

स्पर्धेतील सहा संघांची प्रत्येकी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, यजमान पाकिस्तान आणि नेपाळ अ गटात आहेत. तर ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका आहेत. सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचवेळी, श्रीलंकेच्या भूमीवर पहिला सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात ३१ ऑगस्ट रोजी कॅंडीमध्ये होणार आहे.

हेही वाचा: Neeraj Chopra: एकच वादा नीरज दादा! पहिल्याच फटक्यात गाठली फायनल अन् ऑलिम्पिकचे तिकीट केलं कन्फर्म

भारताचे वेळापत्रक

भारतीय संघ २ सप्टेंबरला कँडीत पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर ४ सप्टेंबरला त्याच मैदानावर त्याचा सामना नेपाळशी होणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील आणि या टप्प्यातील अव्वल दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील. यावेळी आशिया कप ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. विश्वचषकापूर्वी संघांना त्यांच्या तयारीला अंतिम रूप देण्याची ही सुवर्णसंधी असेल.