Sanjay Manjrekar raise question on Virat Rohit and Jasprit Bumrah rest : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेत विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह दिसणार आहेत, जे सध्या विश्रांतीवर आहेत. दरम्यान, दुलीप ट्रॉफीमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिल्याने संजय मांजरेकरांनी पोस्ट करुन प्रश्न उपस्थित केले होते. ज्यावर चाहत्यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

सुनील गावसकर यांनीही याबाबत आक्षेप व्यक्त केला आहे, कारण अशा परिस्थितीत रोहित, विराट आणि बुमराह बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोणत्याही कसोटी सामन्याचा सराव न करता खेळतील. यावर आता संजय मांजरेकर यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत संजय मांजरेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

Sanjeev Goenka Statement on KL Rahul Future Amid Rumors in Lucknow Super Giants
KL Rahul: “मी कोणत्याही…” केएल राहुलला LSG संघ रिलीज करणार? संघमालक संजीव गोयंकांचे मोठे वक्तव्य
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
David Malan Announces Retirement From International Cricket England
David Malan Retirement: इंग्लंडच्या वर्ल्ड नंबर वन खेळाडूची क्रिकेटधून निवृत्ती, कसोटीमधील कामगिरीबद्दल मनात खंत; पाहा नेमकं काय म्हणाला?
Devendra Fadnavis on Narayan Rane Malvan Statue collapse
Malvan Shiv sena UBT vs BJP : मालवणच्या राड्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “नारायण राणे…”
Supreme Court Contempt Notice To Maharashtra additional Chief Secretary
Supreme Court : “हे कसले IAS अधिकारी?” सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना सुनावलं, नोटीसह बजावली
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
Ravindra Jadeja Wife BJP MLA Rivaba Jadeja Inspects Waterlogged Area Video
Ravindra Jadeja Wife: रवींद्र जडेजाची आमदार पत्नी कंबरेभर पाण्यात उतरून करतेय लोकांची मदत, जडेजाच्या कमेंटनेही वेधलं लक्ष, पाहा VIDEO
Amol mitkari jaydeep apte 1
Amol Mitkari : “जयदीप आपटे याचा त्या पुतळ्याद्वारे छुपा अजेंडा…”, मिटकरींचे गंभीर आरोप; देवेंद्र फडणवीसांना म्हणाले…

संजय मांजरेकर यांनी लिहिले, ‘भारताने गेल्या पाच वर्षांत एकूण २४९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि या काळात रोहित शर्मा ५९ टक्के, विराट कोहली ६१ टक्के आणि बुमराह केवळ ३४ टक्के खेळला आहे. मला वाटतं तिघांनाही इतर खेळाडूंच्या तुलनेत भरपूर विश्रांती मिळाली आहे. त्यामुळे त्यांची दुलीप ट्रॉफीसाठी निवड करता येऊ शकली असती.’ यानंतर चाहत्यांनी मांजरेकरांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – Zaheer Khan : झहीर गुरुजी देणार लखनौला शिकवणी; गौतम गंभीरच्या जागी नियुक्ती

संजय मांजरेकरांना चाहत्यांनी दिले प्रत्युत्तर –

एका युजरने लिहिले की, वर्कलोड हे केवळ खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या संख्येवरून ठरवले जात नाही, उदाहरणार्थ, विश्वचषक सामन्यांमध्ये द्विपक्षीय मालिका सामन्यांपेक्षा जास्त वर्कलोड असतो.