Team India Selection Committee Chairman Ajit Agarkar Press Conference : भारतीय क्रिकेट संघ लवकरच श्रीलंकेला रवाना होणार आहे. टीम इंडिया रवाना होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांची सोमवारी पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत अजित आगरकर यांनी हार्दिक पंड्या ऐवजी सूर्यकुमार यादवला भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार का बनवले? यावर प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर हार्दिक पंड्याला कर्णधारपदापासून दूर का केले? यावर प्रतिक्रिया दिली.

हार्दिक अजूनही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू –

निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकर म्हणाले, “हार्दिक पंड्या अजूनही आमच्यासाठी महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. मात्र, त्याच्यासाठी फिटनेस खरोखरच आव्हानात्मक आहे. अशा स्थितीत प्रशिक्षक, निवडकसमिती आणि संघ व्यवस्थापनाला ते थोडे अवघड जाते. पुढील टी-२० विश्वचषकापूर्वी आमच्याकडे बराच वेळ आहे. अशा परिस्थितीत, आम्हाला काही गोष्टी प्रयोग करून पहायच्या आहेत. कारण त्यावर सर्वकाही अवलंबून आहे, परंतु हार्दिक अजूनही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे.”

Rohit Sharma Statement on Jasprit Bumrah Vice Captain Decision Said Bumrah Always Part of Leadership
Rohit Sharma on Bumarh: “त्याने फार वेळा संघाचे नेतृत्त्व केलेले नाही…”, रोहित शर्मा जसप्रीत बुमराहला उपकर्णधार पदाची जबाबदारी दिल्याबाबत पाहा काय म्हणाला?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
mohan bhagwat
“देश अस्थिर करण्याचा प्रयत्न”, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे वक्तव्य
Rohit Sharma Suryakumar Yadav Post on Ratan Tata Death Cricketing World Mourn on Tata Demise
Ratan Tata Death: “इतरांचं आयुष्य चांगलं व्हावं यासाठी जगलात…”, रोहित शर्माची रतन टाटांसाठी भावुक करणारी पोस्ट; सूर्यकुमार यादवनेही व्यक्त केली कृतज्ञता
Arvind Kejriwal
हरियाणातील आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आजच्या निकालातून…”
Prahar Jan Shakti Party MLA Rajkumar Patel joins Shinde faction of Shiv Sena
अमरावती : आ. बच्‍चू कडू यांना धक्‍का; आ. राजकुमार पटेल शिवसेना शिंदे गटात…
Sushilkumar shinde and Sharad Pawar Akluj solapur speech
Sharad Pawar: “मी थोरला, माझ्या नादी लागू नका…”, शरद पवारांची सुशीलकुमार शिंदेंना तंबी
The leaders of the constituent parties expressed their sentiments in the condolence meeting that the India Maha Aghadi was united because of Yechury
येचुरींमुळे ‘इंडिया’ महाआघाडी एकत्र! शोकसभेत घटक पक्षांच्या नेत्यांकडून भावना व्यक्त

केवळ फिटनेसच नाही तर सूर्यामध्ये यशस्वी कर्णधार होण्याची क्षमता –

अजित आगरकर पुढे म्हणाले, “केएल राहुलच्या जागी हार्दिक जेव्हा कर्णधार झाला, तेव्हा मी निवडसमितीचा अध्यक्ष नव्हतो. जेव्हा मी निवडसमितीचा अध्यक्ष झालो, तेव्हा एकदिवसीय विश्वचषक जवळ येत होता आणि त्यानंतर लगेचच टी-२० विश्वचषक होता. हार्दिकसाठी फिटनेस ही समस्या आहे. केवळ फिटनेसच नाही तर सूर्यामध्ये यशस्वी कर्णधार होण्याची क्षमता जास्त आहे, असे आम्हाला वाटते. दोन वर्षे म्हणजे खूप मोठा कालावधी आहे आणि या परिस्थितीत आपल्याकडे वेगवेगळे प्रयोग करुण पाहण्यासाठी बराच वेळ आहे.”

हेही वाचा – पॅरिसला लष्करी तळाचे स्वरूप

जे खेळाडू नेहमीच उपलब्ध असतात त्यांना जास्तीत जास्त संधी –

निवडसमितीचे अध्यक्ष म्हणाले, “जे खेळाडू आमच्यासाठी नेहमीच उपलब्ध असतात त्यांना जास्तीत जास्त संधी द्यायची आहे. या भूमिकेत आम्ही हार्दिकला अधिक चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो, असे आम्हाला वाटते. त्याने टी-२० विश्वचषकात ज्या प्रकारे अष्टपैलू प्रदर्शन केले, ते सर्वांनी पाहिली. अशा परिस्थितीत त्याची कामगिरी संघासाठी महत्त्वाची आहे, ना की कर्णधारपदाचा मुद्दा नाही.”

हेही वाचा – ENG vs WI 2nd Test : इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला ‘हा’ मोठा पराक्रम

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा टी-२० संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.