मुंबई : गेल्या काही काळापासून मोठ्या खेळीच्या शोधात असलेल्या श्रेयस अय्यरला (१९० चेंडूंत १४२ धावा) अखेर शतक साकारण्यात यश आले. त्याच्या शानदार खेळीमुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील महाराष्ट्राविरुद्धच्या लढतीत मुंबईने पहिल्या डावात त्रिशतकी आघाडी मिळवली. त्यानंतर दुसऱ्या डावात महाराष्ट्राने कडवा प्रतिकार करताना दुसऱ्या दिवसअखेर १ बाद १४२ धावांची मजल मारली. मात्र, महाराष्ट्राचा संघ अजूनही १७३ धावांनी पिछाडीवर असल्याने मुंबईचा दबदबा कायम राहिला आहे.

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्याचा दुसरा दिवस मुंबईसाठी श्रेयस आणि आयुष म्हात्रे, तर महाराष्ट्रासाठी हितेश वाळुंज आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी गाजवला. श्रेयसने प्रथमश्रेणी कारकीर्दीतील १४वे शतक साकारताना १२ चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने १४२ धावांची खेळी केली. १७ वर्षीय सलामीवीर आयुष म्हात्रेनेही (२३२ चेंडूंत १७६) अप्रतिम फलंदाजी केली. त्यामुळे मुंबईने पहिल्या डावात ४४१ धावा केल्या.

Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
India Beat England by 150 Runs in 5th T20I Abhishek Sharma Century Mohammed Shami 3 Wickets
IND vs ENG: एकट्या अभिषेक शर्माने इंग्लंडला हरवलं; इंग्लिश संघाचा टी-२० मधील सर्वात वाईट पराभव; १०० धावांच्या आत ऑल आऊट
IND vs ENG Gautam Gambhir played a master stroke as Harshit Rana to beat England Pune T20I match
IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे भारताने मारली बाजी! ‘हा’ निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
IND vs ENG Saqib Mahmood Triple Maiden Wicket Over
IND vs ENG: कानामागून आला, भारी पडला! व्हिसा दिरंगाई बाजूला सारत मेहमूदने भारताची उडवली दाणादाण, ३ चेंडूत ३ विकेट
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
We always learn from a T20I Game Says Suryakumar Yadav after defeat against England in 3rd T20I
IND vs ENG : ‘…म्हणून पराभव पदरी पडला’, सूर्यकुमार यादवने सांगितला राजकोट सामन्यातील टर्निंग पॉइंट
Tilak Varma Scores Most T20I Runs in Between Two Dismissals Broke Mark Chapman Record
IND vs ENG: तिलक वर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये नाबाद राहत केल्या इतक्या धावा; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज

हेही वाचा >>> IND vs NZ : भारत पाचव्या दिवशी न्यूझीलंडविरुद्ध २० वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? जाणून घ्या इतिहास

मग ३१५ धावांच्या पिछाडीनंतर महाराष्ट्राने दुसऱ्या डावाच्या पहिल्याच षटकात सिद्धेश वीरला (०) गमावले. परंतु, ऋतुराजने (७२ चेंडूंत नाबाद ८०) आक्रमक पवित्रा अवलंबताना मुंबईच्या गोलंदाजांवर दडपण आणले. त्याला सचिन धसची (११२ चेंडूंत नाबाद ५९) साथ लाभली. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुनरागमनाच्या आशा कायम राहिल्या आहेत.

त्याआधी, दुसऱ्या दिवशी ३ बाद २२० धावांवरून पुढे खेळताना मुंबईसाठी श्रेयस आणि आयुष यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. त्यांनी तिसऱ्या गड्यासाठी २०० धावांची भागीदारी रचली. आयुष द्विशतकी मजल मारणार असे वाटत असतानाच डावखुरा फिरकीपटू हितेश वाळुंजने त्याला माघारी धाडले. आयुषने १७६ धावांची खेळी २२ चौकार आणि ४ षटकारांनी सजवली. यानंतर मात्र वाळुंजच्या प्रभावी माऱ्यापुढे मुंबईने ठरावीक अंतराने गडी गमावले. सूर्यकुमार यादव (७) अपयशी ठरला.

Story img Loader