India Vs Australia Women Semi Final: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गुरुवारी (23 फेब्रुवारी) महिला टी-२० विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत हरला. भारताला ऑस्ट्रेलियाकडू ५ धावांनी पराभव पत्कारावा केला. ज्यामुळे भारतीय संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. या पराभवानंतर भारतीय महिला संघातील बरेच खेळाडू भावूक झाले होत. त्यानंतर आता कर्णधार हरमनप्रीत कौरच्या एक ट्विट केले. ज्यामध्ये तिने आपल्या चाहत्यांना एक वचने दिले आहे.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १७२ अशी धावसंख्या उभारली होती. त्यामुळे भारतीय संघाला १७३ धावांचे लक्ष्य मिळाले.प्रत्युत्तरात भारताने निर्धारित २० षटकांत ८ विकेट गमावून १६७ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघ पराभूत झाला. आता टीम इंडियाच्या पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीतने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे.

Black market for tickets started three days before cricket match
क्रिकेट सामन्याच्या तीन दिवसांपूर्वीपासूनच तिकिटांचा काळाबाजार…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Kevin Pietersen praises Harshit Rana bowling as a connection substitute during IND vs ENG 4th T20I at Pune
Harshit Rana : “त्याची चूक नाही…”, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे कनक्शन सब्स्टिट्यूट वादात हर्षित राणाच्या समर्थनार्थ वक्तव्य
Jos Buttler Statement on Harshit Rana Concussion Substitute Controversy IND vs ENG
IND vs ENG: “आम्ही सामना जिंकणं अपेक्षित…”, जोस बटलरचं हर्षित राणाच्या खेळण्याबाबत मोठं वक्तव्य, सामन्यानंतर राणा-दुबेबाबत पाहा काय म्हणाला?
IND vs ENG Saqib Mahmood Triple Maiden Wicket Over
IND vs ENG: कानामागून आला, भारी पडला! व्हिसा दिरंगाई बाजूला सारत मेहमूदने भारताची उडवली दाणादाण, ३ चेंडूत ३ विकेट
India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा

हरमनप्रीतने आपल्या पोस्टने चाहत्यांचे आभार मानले आणि आणखी मजबूत पुनरागमन करण्याचे आश्वासन दिले. हरमनप्रीतने ट्विटरवर लिहिले की, “हे आमच्या जगभरातील सर्व चाहत्यांसाठी आहे ,ज्यांनी या विश्वचषकादरम्यान आम्हाला पाठिंबा दिला. आमच्या प्रवासावर विश्वास दाखवल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो. एक क्रिकेट चाहता म्हणून मला माहीत आहे की तुमचा संघ हरताना पाहून वाईट वाटते. पण मी एवढेच म्हणेन की आम्ही जोरदार पुनरागमन करू आणि चमकदार कामगिरी करू.”

विशेष म्हणजे उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने एकेकाळी सामन्यावर पकड मिळवली होती, मात्र हरमनप्रीतच्या धावबादमुळे संघाला धक्का बसला. पंधराव्या षटकात हरमनप्रीत दुसरी धाव घेताना बाद झाली. ती क्रीमध्ये पोहोचणार होती पण तिची बॅट खेळपट्टीवर अडकली आणि यष्टिरक्षक हीलीने चेंडू बेल्स उडवल्या.

हरमनप्रीतने स्वतः कबूल केले की ती धावबाद होणे सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली, ती म्हणाली, “जेमिमासोबतच्या भागीदारीने आम्हाला लय मिळवून दिली. त्यानंतर आम्हाला हरण्याची अपेक्षा नव्हती. मी ज्याप्रकारे धावबाद झाले, यापेक्षा दुर्दैवी दुसरे काहीही असू शकत नाही.”

हेही वाचा – PSL 2023: धक्कादायक! लाइव्ह सामन्यात बाबर आझम हसन अलीला मारण्यासाठी बॅट घेऊन धावला, पाहा VIDEO

शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी १६ धावांची गरज होती, मात्र केवळ १० धावा झाल्या. या सामन्यात भारतीय आघाडीची फळी अपयशी ठरली. मात्र, हरमनप्रीत (३४ चेंडूत ५२) आणि जेमिमाह रॉड्रिग्स (२४ चेंडूत ४३) यांनी शानदार खेळी खेळली. पण त्यांना टीम इंडियाला विजय मिळवून देता आला नाही.

Story img Loader