Sourav Ganguly says Rishabh Pant to become All Time Great in Test Cricket : बीसीसीआयने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली, ज्यामध्ये स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे पुनरागमन झाले. २०२२ नंतर ऋषभ पंत कसोटी संघाचा भाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ऋषभ पंतच्या संघात पुनरागमन करण्याबाबत माजी कर्णधार सौरव गांगुलीने मोठे वक्तव्य केले आहे. गांगुलीने पंतचे सर्वोत्कृष्ट भारतीय कसोटी फलंदाज म्हणून वर्णन केले आणि सांगितले की तो आतापर्यंतचा महान खेळाडू होण्याच्या मार्गावर आहे. पंतच्या पुनरागमनामुळे मला आश्चर्य वाटत नसल्याचेही गांगुलीने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली असे मानतो की ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडू होण्याच्या मार्गावर आहे, परंतु त्याच वेळी त्याला छोट्या फॉरमॅटमध्ये आपली कामगिरी सुधारण्याची गरज आहे. डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघातात जखमी झाल्यानंतर पंतचा रविवारी प्रथमच भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला. त्यामुळे १९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी त्याला प्लेइंग इलेव्हमनमध्ये स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. हा सामना चेन्नईत खेळला जाणार आहे.

ऋषभ पंत भारतातील सर्वोत्तम कसोटी फलंदाजांपैकी एक –

ऋषभ पंतने या वर्षाच्या सुरुवातीला मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले होते आणि त्यात चांगली कामगिरी केली होती. एका कार्यक्रमादरम्यान सौरव गांगुली म्हणाला, ‘मी ऋषभ पंतला भारतातील सर्वोत्तम कसोटी फलंदाजांपैकी एक मानतो. त्यामुळे ऋषभच्या कसोटी क्रिकेटमधील पुनरागमनामुळे मला आश्चर्य वाटत नाही. तो भारताकडून कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहे.’

हेही वाचा – सुवर्णयशाचे ध्येय! बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील भारताच्या मोहिमेस आजपासून प्रारंभ

ऋषभ पंतचा कसोटी क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये समावेश होईल –

सौरव गांगुली पुढे म्हणाला, ‘तो अशीच कामगिरी करत राहिल्यास कसोटी क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होईल. मला विश्वास आहे की त्याला छोट्या फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. तो प्रतिभावान आहे आणि मला खात्री आहे की तो लवकरच असे करण्यात यशस्वी होईल.’

ऋषभ पंतच्या पुनरागमनामुळे टीम इंडिया मजबूत –

ऋषभ पंतचे कसोटी संघात पुनरागमन झाल्याने भारतीय संघ अधिक मजबूत झाला आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची अष्टपैलू कामगिरी. ऋषभ पंत जेवढा मोठे फटके मारण्यात पटाईत आहे, तेवढाच तो यष्टिरक्षणातही यशस्वी ठरला आहे. २०१८ मध्ये कसोटी पदार्पण केल्यापासून ऋषभ पंतच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होत आहे. त्याने त्याच्या किपिंग आणि बॅटिंग स्किल्सवर खूप काम केले आहे, जे मैदानावरही दिसून येते.

हेही वाचा – ENG vs SL: पाथुम निसांका शतक झळकावताच ठरला नंबर वन फलंदाज, इंग्लंडविरूद्ध सामन्यात विक्रमांचा पाऊस

भारताने घरच्या मैदानावर कांगारूंना २-१ ने पराभूत केले तेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२०-२१ च्या परदेशातील कसोटी मालिकेत पंत हा टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅच विनर होता. गाबा येथे झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात, पंतने ८९ धावांची नाबाद खेळी करत भारताला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली असे मानतो की ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडू होण्याच्या मार्गावर आहे, परंतु त्याच वेळी त्याला छोट्या फॉरमॅटमध्ये आपली कामगिरी सुधारण्याची गरज आहे. डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघातात जखमी झाल्यानंतर पंतचा रविवारी प्रथमच भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला. त्यामुळे १९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी त्याला प्लेइंग इलेव्हमनमध्ये स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. हा सामना चेन्नईत खेळला जाणार आहे.

ऋषभ पंत भारतातील सर्वोत्तम कसोटी फलंदाजांपैकी एक –

ऋषभ पंतने या वर्षाच्या सुरुवातीला मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले होते आणि त्यात चांगली कामगिरी केली होती. एका कार्यक्रमादरम्यान सौरव गांगुली म्हणाला, ‘मी ऋषभ पंतला भारतातील सर्वोत्तम कसोटी फलंदाजांपैकी एक मानतो. त्यामुळे ऋषभच्या कसोटी क्रिकेटमधील पुनरागमनामुळे मला आश्चर्य वाटत नाही. तो भारताकडून कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहे.’

हेही वाचा – सुवर्णयशाचे ध्येय! बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील भारताच्या मोहिमेस आजपासून प्रारंभ

ऋषभ पंतचा कसोटी क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये समावेश होईल –

सौरव गांगुली पुढे म्हणाला, ‘तो अशीच कामगिरी करत राहिल्यास कसोटी क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होईल. मला विश्वास आहे की त्याला छोट्या फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. तो प्रतिभावान आहे आणि मला खात्री आहे की तो लवकरच असे करण्यात यशस्वी होईल.’

ऋषभ पंतच्या पुनरागमनामुळे टीम इंडिया मजबूत –

ऋषभ पंतचे कसोटी संघात पुनरागमन झाल्याने भारतीय संघ अधिक मजबूत झाला आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची अष्टपैलू कामगिरी. ऋषभ पंत जेवढा मोठे फटके मारण्यात पटाईत आहे, तेवढाच तो यष्टिरक्षणातही यशस्वी ठरला आहे. २०१८ मध्ये कसोटी पदार्पण केल्यापासून ऋषभ पंतच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होत आहे. त्याने त्याच्या किपिंग आणि बॅटिंग स्किल्सवर खूप काम केले आहे, जे मैदानावरही दिसून येते.

हेही वाचा – ENG vs SL: पाथुम निसांका शतक झळकावताच ठरला नंबर वन फलंदाज, इंग्लंडविरूद्ध सामन्यात विक्रमांचा पाऊस

भारताने घरच्या मैदानावर कांगारूंना २-१ ने पराभूत केले तेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२०-२१ च्या परदेशातील कसोटी मालिकेत पंत हा टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅच विनर होता. गाबा येथे झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात, पंतने ८९ धावांची नाबाद खेळी करत भारताला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.