भारतीय क्रिकेट संघाला रणजी किंवा तत्सम स्थानिक स्पर्धेतून प्रतिभावंत खेळाडू मिळतात. मात्र सध्याच्या घडीला या खेळाडूंना मिळणारे मानधन फारसे समाधानकारक नाही. यासंदर्भात रणजी स्पर्धेतील कर्णधार आणि प्रशिक्षकांनी मानधन वाढून मिळावे, अशी मागणी केली आहे. या मुद्द्यावर आता बीसीसीआय गांभिर्याने विचार करेल, असे वाटते. कारण भारताचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुलीने स्थानिक खेळाडूंच्या दुर्लक्षित मुद्याकडे विशेष लक्ष दिलंय. गांगुली स्थानिक स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंच्या मानधनात वाढ व्हावी, या मुद्द्यावर आग्रही असल्याचे दिसते. नुकत्याच कोलकातामध्ये बीसीसीआयच्या टेक्निकल टिमसोबत झालेल्या बैठकीत त्याने स्थानिक खेळाडूंच्या मानधनाच्या मुद्द्यावर विशेष चर्चा केली. स्थानिक क्रिकेटमुळेच प्रतिभावंत खेळाडू घडतात. त्यामुळे त्यांच्या मागणीकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, असे गांगुलीने बीसीसीआयच्या टेक्निकल टिमला सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा