गोष्ट तशी बरीच जुनी आहे…पण महत्वाची आहे. “गांगुली, सचिन आणि मी असे आम्ही टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही… नवीन खेळाडूंना संधी उपलब्ध करून द्या”, अशा काहीतरी आशयाचा इ मेल तेव्हाचा कॅप्टन द्रविडनी BCCI ला पाठवल्याची बातमी सकाळी-सकाळी वाचली होती. ह्या तिघांशिवाय टीम बनूच शकत नाही वगैरे इमोशनल विचार मनात येत होते आणि गेल्या १०-१२ वर्षाच्या क्रिकेटच्या आठवणी मनावर ‘फॉलोऑन’ लादत होत्या. त्याचबरोबर ‘इंडियन क्रिकेट नीड्स तू मूव्ह ऑन’ वगैरे मॅच्युअर विचार ही मनात येत होते (मॅच्युअर विचार इंग्लिशमध्येच कसे काय येतात देव जाणे)… पण अशा विचार येण्यामागे, पहिल्यांदाच होणारा २०-२० ओव्हर्सचा वर्ल्ड कप आणि टीम इंडियाचा नवीन लूक ह्याबद्दल असणारी उत्सुकता कारणीभूत होती…टीम अनाऊन्स झाली! युवी, धोनीवगैरे ओळखीचे होतेच. पण एक नाव वाचलं……रोहित शर्मा फ्रॉम मुंबई!! “मुंबई क्रिकेट? अर्रे एक नंबर? आपल्याला पहिल्यापासूनच मुंबई क्रिकेटसाठी सॉफ्ट कॉर्नर..शितावरून भाताची परीक्षा करण्यात आपली पीएचडी. एका फटक्यात…’रोहित म्हणजे पुढचा सचिन वगैरे वगैरे बोलून मी हवेत गोळीबार करून टाकला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा