रविवार भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी सुपर संडे ठरवत टीम इंडियानं यंदाच्या वर्ल्डकपमधला आपला सलग आठवा विजय साजरा केला. या विजयात सिंहाचा वाटा उचलला तो किंग कोहली विराटनं. विराट कोहलीनं कारकिर्दीतलं ४९वं शतक झळकावत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्यामुळे भारतासह जगभरातल्या क्रीडारसिकांकडून विराट कोहलीवर स्तुतिसुमनं उधळली जात आहेत. एकीकडे सगळेच विराट कोहलीचं कौतुक करत असताना दुसरीकडे श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसला विराट कोहलीचं अभिनंदन का करावं? असा प्रश्न पडलाय!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाला कुसल मेंडिस?

यंदाच्या विश्वचषकातलं श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात आलं आहे. मात्र, तरीही त्यांचे लीग फेरीतील सामने शिल्लक आहेत. त्यातील बांगलादेशविरुद्धचा सामना सोमवारी असून त्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसनं केलेलं विधान चर्चेचा विषय ठरत आहे. “विराट कोहलीनं कारकिर्दीतलं ४९वं शतक झळकावून सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. तू त्याचं अभिनंदन करशील का?” असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता त्यावर “मी विराट कोहलीचं अभिनंदन का करेन?” असा उलट प्रश्न कुसल मेंडिसनं केला.

“मला आशा आहे की…”, विराट कोहलीच्या ४९व्या वनडे शतकावर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया…

नेटिझन्स मेंडिसवर भडकले!

दरम्यान, कुसल मेंडिसच्या या विधानावर नेटिझन्स, विशेषत: भारतीय क्रिकेटचाहते चांगलेच भडकले आहेत.

काहींनी श्रीलंका यंदाच्या विश्वचषकात तळाशी असण्याला हीच बाब कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.

एका युजरने एशिया कपमध्ये भारतानं श्रीलंकेच्या केलेल्या पराभवाची जाणीव करून दिली.

काहींच्या मते विराटचं शतक म्हणजे आयसीसीच्या इतिहासातला एक महान क्षण होता!

याशिवाय काही युजर्सनं विराटच्या शतकाबरोबरच बाबर आझमच्या शतकावरही अभिनंदन व्हायला हवं, असं म्हटलं आहे. तर काहींनी कुसल मेंडिस “मी का विराट कोहलीचं अभिनंदन करू?” (Why would I congratulate him?) असा प्रश्न विचारला नसून “मी त्याचं अभिनंदन का करणार नाही?” (Why Wont I congratulate him?) असा प्रश्न केल्याचाही दावा केला आहे.

मास्टर ब्लास्टरनं व्यक्त केला ‘हा’ विश्वास!

दरम्यान, विराट कोहलीनं सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केल्यानंतर सचिननं त्यावर प्रतिक्रिया दिली. “मला ४९व्या शतकापासून ५०व्या शतकापर्यंतचा प्रवास करण्यासाठी ३६५ दिवस लागले. मला आशा आहे की विराट कोहलीला तेवढे दिवस लागणार नाही. तो पुढच्या काही दिवसांमध्येच हा टप्पा पार करेल”, अशी प्रतिक्रिया सचिन तेंडुलकरनं दिली आहे.

काय म्हणाला कुसल मेंडिस?

यंदाच्या विश्वचषकातलं श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात आलं आहे. मात्र, तरीही त्यांचे लीग फेरीतील सामने शिल्लक आहेत. त्यातील बांगलादेशविरुद्धचा सामना सोमवारी असून त्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसनं केलेलं विधान चर्चेचा विषय ठरत आहे. “विराट कोहलीनं कारकिर्दीतलं ४९वं शतक झळकावून सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. तू त्याचं अभिनंदन करशील का?” असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता त्यावर “मी विराट कोहलीचं अभिनंदन का करेन?” असा उलट प्रश्न कुसल मेंडिसनं केला.

“मला आशा आहे की…”, विराट कोहलीच्या ४९व्या वनडे शतकावर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया…

नेटिझन्स मेंडिसवर भडकले!

दरम्यान, कुसल मेंडिसच्या या विधानावर नेटिझन्स, विशेषत: भारतीय क्रिकेटचाहते चांगलेच भडकले आहेत.

काहींनी श्रीलंका यंदाच्या विश्वचषकात तळाशी असण्याला हीच बाब कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.

एका युजरने एशिया कपमध्ये भारतानं श्रीलंकेच्या केलेल्या पराभवाची जाणीव करून दिली.

काहींच्या मते विराटचं शतक म्हणजे आयसीसीच्या इतिहासातला एक महान क्षण होता!

याशिवाय काही युजर्सनं विराटच्या शतकाबरोबरच बाबर आझमच्या शतकावरही अभिनंदन व्हायला हवं, असं म्हटलं आहे. तर काहींनी कुसल मेंडिस “मी का विराट कोहलीचं अभिनंदन करू?” (Why would I congratulate him?) असा प्रश्न विचारला नसून “मी त्याचं अभिनंदन का करणार नाही?” (Why Wont I congratulate him?) असा प्रश्न केल्याचाही दावा केला आहे.

मास्टर ब्लास्टरनं व्यक्त केला ‘हा’ विश्वास!

दरम्यान, विराट कोहलीनं सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केल्यानंतर सचिननं त्यावर प्रतिक्रिया दिली. “मला ४९व्या शतकापासून ५०व्या शतकापर्यंतचा प्रवास करण्यासाठी ३६५ दिवस लागले. मला आशा आहे की विराट कोहलीला तेवढे दिवस लागणार नाही. तो पुढच्या काही दिवसांमध्येच हा टप्पा पार करेल”, अशी प्रतिक्रिया सचिन तेंडुलकरनं दिली आहे.