वनडे मालिका खिशात टाकल्यानंतर धवनसेनेने टी-२० मालिकेची सुरुवातही दणक्यात केली. कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला ३८ धावांनी पराभूत केले. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर श्रीलंकेची घसरगुंडी उडाली. नाणेफेक गमावलेल्या भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १६४ धावा केल्या. मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवने आपला दमदार फॉर्म कायम राखत अर्धशतक ठोकले. प्रत्युत्तरात श्रीलंका २० षटकात १२६ धावांवर ढेपाळली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ४ बळी घेतले. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा