Sunil Gavaskar said this is a big slap in face to all people across western border: आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव करून आठव्यांदा आशिया चषकाकवर नाव कोरले. दोन्ही संघांमधला हा अंतिम सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. भारताने प्रथम श्रीलंकेला १५.२ षटकांत अवघ्या ५० धावांत गुंडाळले. त्यानंतर एकही विकेट न गमावता ६.१ षटकांत लक्ष्य गाठले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या या एकतर्फी विजयानंतर सोशल मीडियावर मॅच फिक्सिंगचे मीम्स शेअर होऊ लागले. यावर सुनील गावसकरांनी प्रतिक्रिया दिली.

सीमेपलीकडील सर्व लोकांच्या तोंडावर ही मोठी चपराक –

याबाबत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मीम्स शेअर करणाऱ्यांना खडसावले आहे. पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडावा म्हणून भारताला जाणूनबुजून श्रीलंकेविरुद्ध सुपर-४ मध्ये हरायचे होते, असे मानणाऱ्या लोकांवर गावसकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे. गावसकर यांनी मिड-डेच्या स्तंभात लिहिले आहे की, “श्रीलंकेविरुद्ध २१३ धावांवर बाद झाल्यानंतर भारत मुद्दाम हरला, अशी ओरड करणाऱ्या पश्चिम सीमेपलीकडील सर्व लोकांच्या तोंडावर ही मोठी चपराक आहे. पाकिस्तान अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडावा म्हणून भारत मुद्दाम हरत आहे, असे म्हणणारे लोक किती अज्ञानी आणि मूर्ख आहेत.”

BJP members protested against Canada Fact Check
Viral Photo : ‘कॅनडाविरोधात भाजपाचे आंदोलन, कॅनरा बँकेबाहेर उभं राहून…’ चर्चेतील फोटोत सत्य लपवण्याचा प्रयत्न
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Baba Siddique Shot Dead at Bandra Mumbai Breaking News Updates in Marathi
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींच्या दोन मारेकऱ्यांना अटक करणाऱ्या १० पोलीस अधिकाऱ्यांना मिळणार बक्षीस?
justin trudeau allegation on india
राजनैतिक अधिकाऱ्यांवरील कारवाईनंतर जस्टिन ट्रूडो यांचे भारतावर गंभीर आरोप; पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत म्हणाले…
gauri lankesh murder accused freed
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींचं जामिनानंतर जंगी स्वागत; हारतुऱ्यांनी केला सत्कार!
PAK vs ENG PCB upset on Fakhar Zaman post
PAK vs ENG : बाबरला साथ, विराटचं गुणगान यामुळे पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूवर होऊ शकते खप्पामर्जी; जाणून घ्या घटनाक्रम
Rohit Sharma Suryakumar Yadav Post on Ratan Tata Death Cricketing World Mourn on Tata Demise
Ratan Tata Death: “इतरांचं आयुष्य चांगलं व्हावं यासाठी जगलात…”, रोहित शर्माची रतन टाटांसाठी भावुक करणारी पोस्ट; सूर्यकुमार यादवनेही व्यक्त केली कृतज्ञता
Hardik Pandya No look shot video viral during India vs Bangladesh 1st T20 Match
Hardik Pandya : हार्दिक पंड्याच्या No Look शॉटने चाहत्यांना लावलं वेड, VIDEO होतोय तुफान व्हायरल

अशा परिस्थितीत भारत जाणूनबुजून श्रीलंकेकडून का हरेल?

या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होता, जो पावसामुळे वाया गेला होता. पुन्हा सुपर-४ मध्ये भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. जर भारताने हा सामना गमावला असता, तर पाकिस्तानचा संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडू शकला असता. सुनील गावसकर म्हणाले, “या लोकांनी या शक्यतेचा विचारही केला नाही की, जर भारत श्रीलंकेकडून सामना हरला असता आणि त्यानंतर पाकिस्तानच्या संघाने श्रीलंकेला हरवले असते, त्यानंतर भारत विरुद्ध बांगलादेश सामना पावसामुळे वाया गेला असता, तर भारत अंतिम फेरीत पोहोचू शकला नसता. अशा परिस्थितीत भारत जाणूनबुजून श्रीलंकेकडून का हरेल?”

हेही वाचा – IND vs AUS: ‘त्याच्याकडे इतका अनुभव आहे की…’; आश्विनच्या टीम इंडियातील पुनरागमनावर रोहित शर्माची प्रतिक्रिया

गावसकर पुढे म्हणाले की, “जेव्हा पाकिस्तान श्रीलंकेकडून पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला होता, तेव्हा पराभवासाठी भारताला दोष देणाऱ्यांना आणखी काही षडयंत्राची अपेक्षा होती, पण ते सर्व काही विसरून स्पर्धेतून बाहेर पडल्याचा आरोप करत होते. कर्णधार बाबरने आझमला फटकारण्यास सुरुवात केली. २०१९ च्या विश्वचषकाच्या गट सामन्यात भारत इंग्लंडकडून पराभूत झाला, तेव्हा अशाच प्रकारचे कट उघडकीस आले होते.”

हेही वाचा – IND vs AUS: “जर मी संजूच्या जागी असतो तर…”; टीम इंडियात सॅमसनची निवड झाल्याने इरफान पठाण निराश, चाहत्यांचे BCCI रोहितवर गंभीर आरोप

माजी कर्णधार म्हणाले की, “धोनीसह सर्वांनी जाणीवपूर्वक संथ फलंदाजी केल्याचा आरोप होता. धोनीला जे ओळखतात ते या गोष्टीची साक्ष देतील की त्याला खेळ शेवटपर्यंत नेणे आणि नंतर धमाकेदार खेळणे आवडते. “इंग्लंडने चमकदार गोलंदाजी केली ज्यामुळे ते तेव्हा तसे करू शकले नाहीत, परंतु मूर्खांना वाटले की त्यांना उपांत्य फेरीतून बाहेर काढण्यासाठी हे जाणूनबुजून केले गेले.”