पीटीआय, नवी दिल्ली

भारताचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव २०२६ विश्वचषकापर्यंत भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि कर्णधारपदासाठीचा प्रबळ दावेदार असलेल्या हार्दिक पंड्याला तो मागे टाकू शकतो. पंड्याने या महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी स्वत:ला उपलब्ध ठेवले आहे. मात्र, गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आठ ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणारा सूर्यकुमार नव्याने मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळणारे गौतम गंभीर व निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांची पहिली पसंती असल्याची चर्चा आहे.

Loksatta explained Where exactly did the Indian women team go wrong How affected by the failure of Smriti Mandhana
जेतेपदाचे ध्येय, पण साखळीतच गारद! भारतीय महिला संघाचे नेमके चुकले कुठे? स्मृती मनधानाच्या अपयशाचा कितपत फटका?
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
PV Sindhu enters the second round of the Denmark Open Badminton Tournament sports news
सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश
Rohit Sharma Big Reveals about t20 world cup final match
‘ऋषभ पंतच्या त्या चलाखीमुळं टी२० विश्वचषक जिंकलो’, तीन महिन्यांनंतर रोहित शर्माचा मोठा खुलासा
india vs pakistan womens t20 world cup match preview
पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत चुरस; महिला ट्वेन्टी२० विश्वचषकात आज भारत पाकिस्तान आमने-सामने
batsman jemima rodrigues on t20 world cup
जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीसाठी परिस्थितीनुसार खेळणे आवश्यक! ट्वेन्टी२० विश्वचषकाबाबत जेमिमाचे मत
India vs Bangladesh 2nd Test from today sport news
वर्चस्व राखण्याचे भारताचे लक्ष्य! बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी आजपासून; सलग १८व्या मालिका विजयासाठी प्रयत्नशील
Harmanpreet Kaur believes in winning the ICC World Cup cricket tournament sport news
विश्वविजेतेपदाची सर्वोत्तम संधी! ऑस्ट्रेलियालाही टक्कर देण्याचा महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीतला विश्वास

हेही वाचा >>>IND vs SL : ‘विराट-रोहितच्या जागी ‘या’ खेळाडूंना सलामीला संधी द्या…’, माजी खेळाडूची मागणी

गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजमध्ये भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषक उंचावला. यानंतर रोहित शर्माने क्रिकेटच्या या प्रारुपातून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर नवीन कर्णधाराचा शोध कायम आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक विजेत्या संघातील पंड्या वैयक्तिक कारणांमुळे श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेविरुद्धचे ट्वेन्टी-२० सामने २७ ते ३० जुलैदरम्यान पालेकेले येथे होणार आहे. यानंतर दोन ते सात ऑगस्टदरम्यान कोलंबो येथे एकदिवसीय मालिका होईल. काही दिवसांत श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा होणे अपेक्षित आहे.

‘‘हार्दिक पंड्या भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचा उपकर्णधार होता. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी तो उपलब्धही असेल. त्यामुळे तो संघाचे नेतृत्व करेल असे वाटत होते. मात्र, सूर्यकुमार यादव केवळ श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी नाही तर, २०२६ विश्वचषकापर्यंत संभाव्य कर्णधार बनू शकतो,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका वरिष्ठ सूत्राने सांगितले. ‘‘पंड्याने वैयक्तिक कारणामुळे एकदिवसीय मालिकेतून विश्रांती घेतली आहे,’’ अशीही माहिती सूत्राने दिली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत केएल राहुलने संघाचे नेतृत्व केले होते. त्यामुळे राहुलवर एकदिवसीय मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. तसेच गिलही या पदासाठी आपली दावेदारी उपस्थित करेल.

स्थानिक क्रिकेट खेळणे अनिवार्य

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रम नसताना सर्व तारांकित क्रिकेटपटूंना स्थानिक क्रिकेट खेळावे लागेल, असे ‘बीसीसीआय’ सचिव जय शहा यांनी स्पष्ट केले आहे. मात्र यासाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमरा यांना सूट देण्यात आली आहे. कसोटी खेळणाऱ्या सर्व खेळाडूंनी ऑगस्टमध्ये होणाऱ्या दुलीप करंडक स्पर्धेतील कमीत कमी एक सामना खेळावा, असे ‘बीसीसीआय’ला वाटते. यानंतर भारतीय संघ बांगलादेश व न्यूझीलंड संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.