टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा संघ सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत आहे. सुपर १२ फेरीतील सलग ५ सामने जिंकत पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम चांगलाच फॉर्मात आहे. बाबर एक एक करत अनेक विक्रम आपल्या नावावर करत आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात बाबरने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. बाबर आझमने ३४ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. या खेळीत ५ चौकारांचा समावेश आहे. टी २० मध्ये वेगाने २५०० धावा करण्याचा विक्रम करत विराट कोहलीला मागे टाकलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३२ धावा करताच त्याने हा विक्रम नोंदवला आहे. बाबर आझमने ६२ सामन्यात वेगाने २५०० धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने ६८ सामन्यात २५०० धावा केल्या होत्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा