टी २० वर्ल्डकपमध्ये सलग तीन सामन्यात विराट कोहलीने नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर स्कॉटलंडविरूद्धच्या सामन्यात नशिबाने साथ दिली. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर विराटने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पहिला सामना पाकिस्तानसोबत झाला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकल्याने भारताला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली होती. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातही भारताने नाणेफेकीचा कौल हरला. त्यामुळे पुन्हा प्रथम फलंदाजी करावी लागली. त्यानंतर आता अफगाणिस्तानसोबतही भारताने नाणेफेक गमावली आणि पहिली फलंदाजी करावी लागली होती. भारतीय संघाने पहिले दोन सामने गमावल्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकला. मात्र उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी टीम इंडियाला आजही मोठा विजय आवश्यक आहे. भारताने आज जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरला विश्रांती दिली असून फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला संधी दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा