आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत आज भारताने अजून एका मोठ्या विजयाची नोंद केली आहे. भारताने दुबईच्या मैदानावर दुबळ्या स्कॉटलंडवर ८ गड्यांनी सहज विजय मिळवत उपांत्या फेरीचे आव्हान शाबुत ठेवले. आज आपला ३३वा वाढदिवस साजरा करणारा भारताचा कप्तान विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी ३ बळी घेत स्कॉटलंडच्या एकाही फलंदाजाला मैदानावर जास्त काळ टिकू दिले नाही. प्रत्युत्तरात भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी दे-दणादण फटकेबाजी केली. राहुलने १८ चेंडूत अर्धशतक ठोकल्यामुळे भारताने हे आव्हान ६.३ षटकातंच ओलांडले. या विजयामुळे भारताने नेट रनरेटमध्ये मोठी कमाई केली. त्यांनी ग्रुप बी मध्ये सर्वात चांगला रनरेट मिळवला. रवींद्र जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता सर्वांचे लक्ष न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामन्याकडे लागले आहे. अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पाडाव केला, तर भारताचा मार्ग सुकर होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा