Team India Will Come To Pakistan says Rashid Latif : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ते १ डिसेंबरपासून आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारणार आहेत. ही बातमी येताच चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत पाकिस्तानच्या अपेक्षा वाढल्या आहेत. याप्रकरणी पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने भारत पाकिस्तानात येणार असल्याची हमी दिली आहे. जवळपास तीन दशकांनंतर पहिल्यांदाच घरच्या भूमीवर आयसीसी स्पर्धा आयोजित करण्यासाठी पाकिस्तान उत्सुक आहे. पण भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही हा मुद्दा चांगलाच तापला आहे.

जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्याने पाकिस्तानच्या आशा वाढल्या –

बीसीसीआय टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवू इच्छित नाही, अशा अफवा सर्वत्र पसरल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताला आपले सामने तटस्थ ठिकाणी खेळायचे आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची आयसीसीचे नवे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचा अंदाज अनेक चाहत्यांनी बांधला आहे. पण दुसरीकडे यानंतर पाकिस्तानच्या अपेक्षा दुपटीने वाढल्या आहेत. याचे कारण पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतीफने सविस्तरपणे सांगितले आहे.

Basit Ali Gives Suggestion to PCB Said Just Copy What India Is Doing
PAK vs BAN: “भारतीय संघाला कॉपी करा…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा PCB ला सल्ला; म्हणाला, “पाकिस्तान क्रिकेट यशस्वी होण्यासाठी भारत…”
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
Virat Kohli on Shubman Gill AI generated video viral
Virat Kohli : ‘एकच विराट आहे…’, स्वत:शी शुबमन गिलची तुलना केल्याने संतापला कोहली; VIDEO व्हायरल झाल्याने खळबळ
Kamran Akmal big statement on Virat Kohli and Rohit Sharma
Kamran Akmal : कोहली-रोहितबद्दल कामरान अकमलचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “पाकिस्तानमध्ये विराटपेक्षा जास्त तर…”
Ravichandran Ashwin on Rohit Sharma about IPL 2025
रोहित IPL 2025 मध्ये मुंबईकडून खेळणार की नाही? अश्विनने दिले उत्तर; म्हणाला, ‘तो अशा खेळाडूंपैकी आहे जे…’
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”

रशीद लतीफ काय म्हणाला?

‘कॉट बिहाइंड’ या यूट्यूब चॅनलवर बोलताना रशीद लतीफ म्हणाला, ‘जर जय शाह यांची बिनविरोध निवड झाली असेल, तर याचा अर्थ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) ही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मला वाटते की टीम इंडिया पाकिस्तानात न जाण्याच्या घोषणेवर, ते स्वाक्षरी करतील अशी शक्यता नाही. मला वाटते की भारत पाकिस्तानमध्ये येत आहे, हे जवळपास ५०% स्पष्ट आहे.

हेही वाचा – Virat Kohli : ‘एकच विराट आहे…’, स्वत:शी शुबमन गिलची तुलना केल्याने संतापला कोहली; VIDEO व्हायरल झाल्याने खळबळ

टीम इंडियाने पाकिस्तानचा शेवटचा दौरा कधी केला होता?

१९९६ च्या विश्वचषकाचे संयुक्त यजमानपद भूषवल्यापासून पाकिस्तानने आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन केलेले नाही. मात्र, त्यांनी २०२३ च्या आशिया चषकाचे आयोजन केले होते. पण टीम इंडिया पाकिस्तानात गेली नाही आणि सामने श्रीलंकेत खेळवले गेले. विशेष म्हणजे टीम इंडियाने २००८ च्या आशिया चषकासाठी शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता.