Rohit Sharma Statement On WTC Final : बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला अखेरचा चौथा कसोटी सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे भारताने २-१ ने आघाडी घेत या मालिकेवर विजय संपादन केलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना रंगला. तत्पुर्वी, न्यूझीलंडने श्रीलंकेचा पहिल्या कसोटी सामन्यात पराभव केल्याने भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा प्रवेश निश्चित झाला. हा कसोटी सामना अनिर्णीत ठरल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत मोठं विधान केलं आहे.

रोहितनं पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं की, ज्या भारतीय खेळाडूंचे इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023)चे संघ या टी २० लीगच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करणार नाहीत, ते खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याआधी लंडनमध्ये दोन आठवड्याच्या शिबिरात सहभाग घेऊ शकतात. डब्ल्यूटीसी फायनल आयपीएलनंतर लगेच जूनमध्ये खेळवण्यात येणार आहे. आयपीएल फायनल २९ मेला आहे. तर डब्ल्यूटीसी फायनल ७ जूनला ओव्हलमध्ये सुरु होईल.

Kevin Pietersen praises Harshit Rana bowling as a connection substitute during IND vs ENG 4th T20I at Pune
Harshit Rana : “त्याची चूक नाही…”, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे कनक्शन सब्स्टिट्यूट वादात हर्षित राणाच्या समर्थनार्थ वक्तव्य
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Cricketer from Dombivli Shreyas Gurav has been selected in mumbai Ranji team
डोंबिवलीच्या श्रेयस गुरव यांची मुंबई रणजी संघात निवड
Abhijeet Chavan
“मेल्या, चप्पल तरी काढ”, नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिजीत चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तीच तर…”
Ravi Bishnoi Reveals Inside Chat With Tilak Varma During Match Winning Partnership vs England
IND vs ENG: “तो सेट झाला होता आणि मी घाईघाईत…”, तिलक वर्मा-रवी बिश्नोईमध्ये अखेरच्या षटकांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Gautam Gambhir Manoj Tiwary Controversy : Gautam says Sourav Ganguly apna jack laga ke aaya Manoj Tiwary has revealed
Manoj Tiwary : ‘तो जॅक लावून आला आणि तू पण…’, गंभीरने गांगुलीबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य; मनोज तिवारीचा खुलासा
Akshay Kumar dismisses Vivek Oberoi claim he went to bed when guests were having dinner
रात्री ९ वाजता झोपतो, अक्षय कुमारची कबुली; पाहुणे जेवत असताना निघून गेल्याच्या विवेक ओबेरॉयच्या वक्तव्याबद्दल म्हणाला…
IND vs ENG Abhishek Sharma Credits Gautam Gambhir and Suryakumar Yadav's Backing For His Return To Form
IND vs ENG : ‘मला पूर्ण स्वातंत्र्य दिले…’, अभिषेक शर्माने आपल्या वादळी खेळीचे श्रेय कोणाला दिले? जाणून घ्या

नक्की वाचा – ‘WTC’ च्या फायनलमध्ये भारताची एन्ट्री! गूड न्यूज मिळताच विराटने मैदानातच केलं असं काही…Video झाला व्हायरल

कोविड १९ नंतर पहिल्यांदाच घरेलू मैदानावर आयपीएल खेळवण्यात येणार आहे. भारताच्या कसोटी खेळाडू्ंमध्ये फक्त चेतेश्वर पुजाराचा आयपीएलमध्ये सहभाग नाहीय. ऑस्ट्रेलिया विरोधात झालेली कसोटी मालिका २-१ ने जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने पीटीआयच्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं, “हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही त्या सर्व खेळाडूंसोबत नेहमी संपर्कात राहू, जे डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये खेळणार आहेत. तसंच त्यांच्या कार्यक्षमतेकडेही लक्ष ठेवू. जेणेकरून त्यांच्यासोबत काय होत आहे, याबाबत आम्हाला माहिती मिळेल. २१ मे पर्यंत सहा संघ आयपीएलच्या प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर जे खेळाडू उपलब्ध असतील, ते खेळाडू लवकरात लवकर ब्रिटनला पोहोचतील,यासाठी आम्ही प्रयत्न करू.”

तीन मुख्य वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (रॉयल चेलॅंजर्स बेंगलोर), मोहम्मद शमी (गुजरात टायटंस), उमेश यादव (कोलकाता नाईट रायडर्स) त्यांच्या फ्रॅंचायजीसाठी नियमितपणे खेळण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या १४ ग्रुप लीग खेळातून कमीत कमी १२ मध्ये खेळण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीत त्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवणं महत्वाचं ठरणार आहे.

रोहितने म्हटलं, “आम्ही सर्व वेगवान गोलंदाजांना काही (लाल) ड्यूक चेंडू पाठवत आहोत. त्यांना यामुळे गोलंदाजी करण्याचा वेळ मिळतो. पण सर्व त्या खेळाडूंवर अवलंबूत असतं. भारता एसजी टेस्ट आणि ऑस्ट्रेलिात कूकाबूरा, तर इंग्लंडमध्ये ड्यूक चेंडूने टेस्ट खेळवली जाते. शमी,उमेश आणि सिराज सामन्यांतून आणि व्यस्त कार्यक्रमातून किती वेळ काढतात, हे पाहावं लागेल. पण टेस्ट टीमच्या बहुतांश सदस्यांसाठी इंग्लंड नवीन जागा नाहीय. कारण ते सर्व खेळाडू त्या ठिकाणी मालिका खेळले आहेत आणि काही खेळाडूंनी काउंटी क्रिकेटही खेळलं आहे.

Story img Loader