भारत आणि न्यूझीलंड संघातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-२० सामना रविवारी लखनऊमध्ये पार पडला. हा सामना भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने ६ गडी राखून मात केली. सामन्यानंतर सूर्यकुमार यादवला शानदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. सामन्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यकुमार यादवने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.

या भेटीनंतर सूर्यासोबतचा फोटो शेअर करताना योगी आदित्यनाथ यांनी एक खास संदेशही लिहिला आहे. यानंतर दोघांचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये सूर्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहे. दोघांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट झाली.

Tejaswini Pandit
“माझ्या बालमित्राने मला…”, सुंदर साडीतील फोटोंमध्ये तेजस्विनी पंडितची खास पोस्ट; म्हणाली, “माझं न संपणारं प्रेम…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Akshay Kumar
“स्टंट पाहून दिग्दर्शक घाबरून पळून गेले…”, अक्षय कुमारने सांगितला २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा रंजक किस्सा
Amitabh Bachchan
“अमिताभ बच्चन यांना ‘दीवार’ साठी निवडले, त्यावेळी….”, प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “राजेश खन्ना…”
What Varsha Gaikwad Said?
Varsha Gaikwad : “कुर्ला भागातील मदर डेअरीची जमीन गौतम अदाणींच्या घशात…”; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप
Ajit Pawar avoided to sitting next to sharad pawar
Ajit Pawar : शरद पवारांच्या बाजूला बसणं का टाळलं? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “माझा आवाज…”
Akshay Kumar
अक्षय कुमारची सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया; म्हणाला, “कुटुंबाचे संरक्षण…”
What Ajit Pawar Said About Saif Ali Khan
Ajit Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्याचा घटनाक्रम सांगत अजित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, “नवा मुद्दा आला की..”

योगी आदित्यनाथ यांनी हा फोटो शेअर करत लिहिले, ”लखनऊ येथील अधिकृत निवासस्थानी युवा आणि उत्साही सूर्यकुमार यादव (मिस्टर 360) याच्यासोबत.”

या सामन्यात सूर्यकुमार यादवने ३१ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या. लखनऊच्या खेळपट्टीवर धावा काढणे किती कठीण होते, याचा अंदाज सूर्यकुमारच्या खेळीवरुन येतो. या सामन्यात सूर्या सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ विकेट गमावत ९९ धावा केल्या, प्रत्युत्तरात टीम इंडियाला १०० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. भारताने १९.५ षटकात ४ विकेट गमावत १०१ धावा करत सामना जिंकला.

हेही वाचा – IND vs AUS: दिनेश कार्तिकने कॉफीच्या पॅकेट्सवरुन मार्नस लाबुशेनची घेतली फिरकी; म्हणाला, ‘अरे मित्रा…’

तसेच भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारत आणि न्यूझीलंड संघातील तिसरा टी-२० सामना बुधवारी अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना निर्णायक ठरणार आहे. कारण दोन्ही संघ हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करताना दिसतील.

Story img Loader