Ranji Trophy 2024: अतिशय चुरशीच्या अशा सेमी फायनल लढतीत तुल्यबळ मध्य प्रदेश संघाला ६२ धावांनी नमवत विदर्भ संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स मैदानावर झालेल्या या मुकाबल्यात विदर्भला पाचव्या आणि अंतिम दिवशी पाच विकेट्सची तर मध्य प्रदेशला ९३ धावांची आवश्यकता होती. पण विदर्भच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत अवघ्या तासाभरात मध्य प्रदेशचा डाव गुंडाळला आणि दिमाखदार विजय साकारला.

१० तारखेपासून मुंबईतल्या वानखेडे मैदानावर होणार असलेल्या अंतिम लढतीत विदर्भसमोर बलाढ्य मुंबईचं आव्हान असणार आहे. मुंबईने सेमी फायनलच्या लढतीत तामिळनाडूवर डावाच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला होता. यानिमित्ताने रणजी करंडक महाराष्ट्रातच राहण्याचा योग जुळून आला आहे. मुंबईच्या नावावर तब्बल ४१ तर विदर्भच्या नावावर २ जेतेपदं आहेत.

Sportsmen from Nagpur done well in competition and won six gold medals,three silver medals and one bronze medal
राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत नागपूरचे वर्चस्व, सहा सुवर्णपदकांसह….
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
Nashik district receives 92 pc of annual rain till date
Nashik Rain : नाशिकमध्ये सरासरीच्या ९२.०४ टक्के पाऊस
western Maharashtra vidhan sabha
पश्चिम महाराष्ट्रात मविआची मुसंडी?
Earthquake in pakistan
Earthquake in Pakistan : पाकिस्तानच्या करोरमध्ये भूकंप; अफगाणिस्तानसह दिल्ली, पंजाबपर्यंत जाणवले धक्के!
Pune-Hubli Vandebharat Express sanctioned
पुणे-हुबळी वंदेभारत एक्स्प्रेसला मंजुरी
Miraj Assembly Constituency Suresh Khade in Miraj Vidhan Sabha Election 2024
कारण राजकारण : पश्चिम महाराष्ट्रात कमळ फुलवणारा आमदारच अडचणीत
legal notice to Central Railway Panchvati and Rajya Rani Express running late
नाशिक: पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेसला विलंब, रेल्वेला नोटीस

विदर्भने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आव्हानात्मक खेळपट्टीवर विदर्भला १७० धावांचीच मजल मारता आली. विदर्भकडून करुण नायरने ६३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सलामीवीर अथर्व तायडेने ३९ धावा करत त्याला चांगली साथ दिली. मध्य प्रदेशकडून अवेश खानने ४ विकेट्स पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना मध्य प्रदेशने हिमांशू मंत्रीच्या दमदार शतकाच्या बळावर २५२ धावा केल्या. हिमांशूने एकखांबी नांगर टाकून १३ चौकार आणि एका षटकारासह १२६ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. हिमांशूला बाकी फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. विदर्भतर्फे उमेश यादव आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. मध्य प्रदेशला ८२ धावांची आघाडी मिळाली.

पहिल्या डावात भंबेरी उडालेल्या विदर्भने दुसऱ्या डावात मात्र ४०२ धावांचा डोंगर उभारला. सहाव्या क्रमांकावर खेळणाऱ्या यश राठोडने १८ चौकार आणि २ षटकारांसह १४१ धावांची दमदार खेळी साकारली. कर्णधार अक्षय वाडकरने ७७ तर अमन मोखाडेने ५९ धावा करत त्याला चांगली साथ दिली. यश-अक्षय यांनी सहाव्या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी केली. मध्य प्रदेशकडून अनुभव अगरवालने ५ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या रचत विदर्भने मध्य प्रदेशसमोर ३२१ धावांचं लक्ष्य ठेवलं.

मध्य प्रदेशने हिमांशू मंत्रीला झटपट गमावलं. पण यानंतर यश दुबे आणि हर्ष गवळी यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी करत मध्य प्रदेशच्या आशा पल्लवित केल्या. यश ठाकूरने हर्षला बाद करत ही जोडी फोडली. हर्षने ११ चौकारांसह ६७ धावांची खेळी केली. हर्षला बाद केल्यानंतर यशने एका बाजूने बराच काळ किल्ला लढवला पण विदर्भने दुसऱ्या बाजूने सातत्याने विकेट्स घेत मध्य प्रदेशच्या डावाला खिंडार पाडले. कर्णधार शुभम शर्मा, भारताचं प्रतिनिधित्व केलेला वेंकटेश अय्यर यांच्याकडून मध्य प्रदेशला अपेक्षा होत्या पण ते मोठी खेळी करू शकले नाहीत. चौथ्या दिवसअखेर मध्य प्रदेशने सहा विकेट्स गमावल्या होत्या. पाचव्या आणि अंतिम दिवशी विदर्भच्या गोलंदाजांनी जराही वेळ न दवडता उर्वरित विकेट्स पटकावत विजयावर शिक्कामोर्तब केलं.