Vijay Hazare Trophy Mumbai vs Arunachal Pradesh: विजय हजारे ट्रॉफीच्या या मोसमाच्या तिसऱ्या टप्प्यातही मुंबई संघ उत्कृष्ट कामगिरी करत आहे. मुंबई संघाने कर्णधार बदलला असतानाही अरुणाचल प्रदेशविरूद्धच्या सामन्यात एकतर्फी विजय नोंदवला. या सामन्यात श्रेयस अय्यरच्या जागी मुंबईचे नेतृत्व शार्दुल ठाकूरकडे होते. या सामन्यात श्रेयस अय्यर खेळला नाही आणि शार्दुलच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या गोलंदाजांनी विरोधी संघाला केवळ ७३ धावांत गुंडाळले आणि त्यानंतर ३३ चेंडूत ७७ धावा करून सामना ९ विकेटने सहज सामना जिंकला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पहिल्या डावात अरुणाचल प्रदेशचा संघ ३२.२ षटकांत ७३ धावांवर गारद झाला. अरूणाचल संघाचा एकही फलंदाज मैदानावर फार काळ टिकू शकला नाही.

हेही वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO

मुंबईला विजयासाठी ७४ धावांचे सोपे लक्ष्य होते आणि मुंबईने ५.३ षटकांत म्हणजे ३३ चेंडूत एक गडी गमावून ७७ धावा केल्या आणि सामना जिंकला. मुंबईचा हा सलग दुसरा विजय ठरला. तीन सामन्यांत मुंबईने आतापर्यंत एक सामना गमावला आहे तर दोन सामने जिंकले आहेत.

अरूणाचल प्रदेशविरूद्धच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली आणि अरुणाचल प्रदेशचे फलंदाज पूर्णपणे बॅकफूटवर दिसले. मुंबईकडून कर्णधार शार्दुल ठाकूर, हर्ष तन्ना, हिमांशू सिंग आणि अथर्व अंकोलकर यांनी प्रत्येकी २ तर रेस्टन डायस आणि श्रेयांश शेडगे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – Virat Kohli Fined: विराट कोहलीवर ICC ने केली कारवाई, सॅम कोन्स्टासबरोबर वाद घालणं पडलं भारी

अरुणाचल प्रदेशसाठी खालच्या फळीतील फलंदाज याब नियाने १७ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली तर तेची डोरियाने १३ धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला १० धावांचा आकडाही गाठता आला नाही आणि संपूर्ण संघ ३२.२ षटकांत ७३ धावा करत गारद झाला.

हेही वाचा – IND vs AUS: “मैदानावर जे काही…”, विराट कोहलीबरोबर झालेल्या धक्काबुक्कीवर सॅम कोन्स्टासचं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?

मुंबईला विजयासाठी सोपे लक्ष्य मिळाले होते आणि या संघाचा सलामीवीर फलंदाज अंगक्रिश रघुवंशी याने अवघ्या १८ चेंडूत ५० धावांची नाबाद खेळी केली आणि यादरम्यान त्याने एक षटकार आणि ९ चौकार लगावत विस्फोटक फलंदाजी केली.तर दुसरा सलामीवीर फलंदाज आयुष महात्रे याने ११ चेंडूत १५ धावा केल्या. याशिवाय हार्दिक तामोरेने ४ चेंडूत नाबाद ७ धावा केल्या आणि त्याने आंगक्रिशच्या साथीने सामना सहज जिंकला. त्याच्या या शानदार खेळीसाठी अंगक्रिश रघुवंशी याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay hazare trophy mumbai beat arunachal pradesh by 9 wickets under shardul thakur captaincy bdg